मित्रांसोबत गेलेले सामाजिक कार्यकर्ते छोटू पाटील बाभळीकर बेपत्ता : घातपात झाल्याचा संशय
अंकुशकुमार देगावकर
नायगाव : चार दिवस वसापुर्वी मित्रासोबत गेलेले धर्माबाद येथील सामाजिक कार्यकर्ते छोटु पाटील बाभळीकर बेपत्ता असून. या प्रकरणी पत्नीने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मात्र ज्यांनी सोबत घेवून गेले त्यांनीच घातपात केला असल्याची चर्चा होत आहे. बुधवारी सकाळी संशय असलेल्यांना धर्माबाद पोलिसांनी ताब्यात घेवून चौकशी करत आहेत.
सामाजिक कार्यकर्ते असलेले भुजंगराव उर्फ छोटू पाटील बाभळीकर हे धर्माबाद येथेच राहत होते. दि. ५ मार्च रोजी सकाळी ७ वाजताच्या दरम्यान रत्नाळी येथील प्रल्हाद उर्फ पप्पू शंकरराव चातरवाड याच्या सोबत गेले होते. पण घरी परत न आल्याने बाभळीकर यांची पत्नी राजश्री भुजंगराव उर्फ छोटू पाटील सुर्यवंशी (३१) यांनी दि. ७ मार्च रोजी धर्माबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सदरच्या तक्रारीत प्रल्हाद चातरवाड यानेच फुस लावून पळवून नेल्याचे नमूद केले आहे.
रविवारी सकाळी घरातून जातांना पप्पू चातरवाड याने माझ्या पतीला सोबत १० हजार रुपये घ्यायला लावले त्याचबरोबर मोबाईलही घेवू दिला नाही. घरून गेल्यानंतर पुन्हा सकाळी ९.३८ वाजता फोन करुन मी पप्पूच्या मळ्यात जात आहे. त्यानंतर पुन्हा १०.१३ वाजता फोन करुन पत्नीला सांगितले कि मी घरी येण्याचा प्रयत्न करत आहे पण पप्पू मच्छी खावूत म्हणून घरी येवू देत नाही त्यामुळे त्याचा मला संशय येत आहे. असे सांगून मी ४ वाजेपर्यंत घरी आलो नाही तर पप्पूच्या फोनवर फोन करणे मी पप्पू सोबतच राहतो कुठेही जाणार नाही असे सांगितले होते.
सायकाळी 05.30 वा. चे सुमारास पप्पू हा आमच्या घरी चार टरबूज घेवून आला व मला म्हणाला की भूजंगराव सूर्यवंशी कुठे आहेत. तेव्हा मी त्यास माझे पतीस सकाळी घेवून गेलास तूलाच माहीत माझा नवरा कूठे आहे. असे म्हणाले तेव्हा तो काही एक न बोलता घरातून निघून गेला. त्यानंतर मी सांसू सासरे व माझ्या इतर नातेवाईकाकडे माझ्या पती विषयी चौकशी केली पण काहीही पता लागला नाही.
त्यानंतर सायंकाळी 06.30 वा. माझा भाचा ईश्वर हिवराळे यानी पप्पू यास फोन करून घरी बोलावून माझा पती कुठे आहे. याबाबत विचारपूस करता तो उडवाउडवीचे उत्तरे देवून उध्दट भाषेत तुम्हाला काय करायचे करा अशी भाषा वापरुन निघून गेल्याने घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
धर्माबाद पोलीसांचा हलगर्जीपणा….
दिलेल्या तक्रारीत मुद्देसून माहिती सांगण्यात आली असून यात अनेक नावे आहेत पण धर्माबाद पोलीस ठाण्याच्या कारभाऱ्यांनी याबाबत कसलेच गांभीर्य दाखवले नाही. त्यामुळे एवढ्या गंभीर प्रकरणाचा तपास किती गांभीर्याने करत आहेत असे दिसून आले.