भंडाऱ्याच्या जेवनातून 150 नागरिकांना विषबाधा : लालवंडी येथील घटना

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : तालुक्यातील लालवंडी येथे भंडाऱ्याच्या जेवनातून विषबाधा झाल्याची घटना दि. १५ रोजी सायंकाळी घडली. भंडाऱ्याचे जेवन केल्यानंतर सायंकाळी मळमीव पोटदुखण्याचे प्रकार वाढल्याने जवळपास १५० लहान मुलासह नागरिकांना उपचारासाठी नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार करण्यासाठी केवळ दोनच वैद्यकीय अधिकारी असल्याने विषबाधा झालेल्या रुग्णांना रेफर करण्यात येत होते. हि गंभीर परिस्थिती पाहून स्थानिक डॉक्टरांनी उपचार करण्यासाठी रुग्णालयात धाव घेतली.

नायगाव तालुक्यातील लालवंडी येथे महादेव मंदिराचा भंडारा होता. या भंडाऱ्याचे निमित्ताने पुर्ण गावाला निमंत्रण होते. त्यामुळे या भंडाऱ्याच्या महाप्रसादाचा गावातील शेकडो नागरिकांना लाभ घेतला. मात्र महाप्रसादाचा लाभ घेतलेल्या काही नागरिकांना सायंकाळच्या दरम्यान मळी, उलट्या होणे पोट दुखाण्याचे प्रकार वाढले. त्यामुळे अनेजन तातडीने नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. पाहता पाहता जवळपास दिडशे नागरिकांनी उपचारासाठी रुग्णालयात धाव घेतली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला रुग्नापेक्षा नातेवाईकांची मोठी गर्दी झाली.

एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण दाखल.होत असताना केवळ दोनच वैद्यकीय अधिकारी उपचार करण्यासाठी उपलब्ध होते. वैद्यकीय अधिक्षकासह अन्य अधिकारी गायब असल्याचे दिसून आले. दाखल रुग तळमळत असतांना उपचार वेळेवर मिळत नव्हते नातेवाईकांनी अन्य वैद्यकीय अधिकारी कुठे आहेत अशी विचरणा केली असता कुणीही उतर देवू शकले नाही. उपचार करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी दोन आणि रूग्ण दिडशेच्या वर यामुळे अभुतपुर्व परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे काहींना शहरातील खाजगी डॉक्टरांना घडलेल्या घटनेची माहिती दिली असता खाजगी डॉक्टरांनी ग्रामीण रुग्णालयात जावून दाखल रुग्णांवर उपचार करण्यासाठी मदत केली.
घटनेची माहिती समजल्यानंतर राजकीय नेत्यासह सामाजिक कार्यकर्ते ग्रामीण रुग्णालयात भेट देवून परिस्थितीचा आढावा घेतला. दाखल करण्यात आलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली.