ताज्या बातम्यानांदेडनायगांव

इंग्रजी माध्यमांच्या शाळेमुळ जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी संख्येत मोठ्या प्रमाणात घट

मनोहर मोरे

किनाळा :- आपला पाल्य उच्च व दर्जेदार अशा इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिक्षण घेतला पाहिजे यासाठी नामांकित अशा इंग्रजी माध्यमांच्या शाळेत आपल्या पाल्यांना प्रवेश देण्यासाठी पालक लाखो रुपये फी भरून अनेक पालक इंग्रजी माध्यमांच्या शाळेतच पाल्यांना प्रवेश देत असल्याने पूर्वीपासून शासनाच्या विविध गावांमध्ये असलेल्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या मात्र मोठ्या प्रमाणात घटत असल्याने येणाऱ्या काळात या जिल्हा परिषद शाळा बंद पडणार असे चित्र दिसत आहे.

शंकरनगर व परिसरात मोठ्या प्रमाणात इंग्रजी माध्यमांच्या शाळा व मराठी माध्यमांच्या खाजगी शाळा असून या इंग्रजी व मराठी माध्यमांच्या शाळेत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देऊन त्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी संस्थेचे प्रमुख व शाळेचे शिक्षक विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक सुविधा देऊन आपल्या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी अनेक पद्धतीचे प्रयत्न करून विद्यार्थी मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालका कडे जाऊन आपल्या शाळेच्या असलेल्या सुविधा पालकांना सांगून त्या पालकाकडून आपल्याच शाळेत त्यांच्या विद्यार्थ्यांचा प्रवेश झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करत असल्याने पालक देखील अशाच नामांकित शाळेत पैशाची चिंता न करता आपल्या पाल्यांना प्रवेश देत आहेत.

शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात इंग्रजी माध्यमांच्या शाळेत विद्यार्थी मिळवण्यासाठी इंग्रजी माध्यमांच्या शाळेकडून मोठ्या प्रमाणात शाळेची जनजागृती करून विद्यार्थी मिळवण्यासाठी जसे प्रयत्न केले जात आहेत तसे गावातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षणा बरोबरच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची जबाबदारी घेऊन शासन स्तरावरून विद्यार्थी वाढवण्यासाठी कसलेही प्रयत्न केले जात नसल्याने गेल्या चार ते पाच वर्षात विविध गावातील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थी संकेत मोठ्या प्रमाणात घट झाली असून येणाऱ्या काळात या जिल्हा परिषद शाळेकडे शासन व लोकप्रतिनिधींनी वेळीच लक्ष देऊन जिल्हा परिषद शाळेतील होणारी विद्यार्थ्यांची घट थांबवण्यासाठी योग्य निर्णय घेतले नाही तर येणाऱ्या काळात या जिल्हा परिषद शाळा बंद पडण्यास वेळ लागणार नाही असे चित्र ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेचे दिसून येत आहे.

शासनानी व लोकप्रतिनिधीने प्रत्येक गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी शिक्षकांची मुल व विविध क्षेत्रात शासकीय सेवेत कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मुलं जिल्हा परिषद शाळेत असली पाहिजे असा आदेश काढला तर निश्चितच जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थी संख्या वाढण्यास मदत होईल मात्र शिक्षकांचीच मुले जिल्हा परिषद शाळेत नसल्याने जिल्हा परिषद शाळेची वाताहत होत असल्याचे दिसून येत असताना प्रत्येक गावातील बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या जिल्हा परिषद शाळा सुरू ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी याकडे लक्ष देतील का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker