ताज्या बातम्यानांदेडनायगांव

खा.अशोकराव चव्हाण यांनी केलेले वक्तव्य नैराष्येतुन – खा.वसंतराव चव्हाण

प्रभाकर लखपत्रेवार

नायगाव : राज्यसभा सदस्य अशोकराव चव्हाण यांनी अभ्यासिका लोकार्पण सोहळ्या प्रसंगी केलेले वक्तव्य “तुम आगे बढो हम कपडे संभालते है” हे वक्तव्य अत्यंत नैराष्येतुन केले असुन हा कॉग्रेस कार्यकर्त्या प्रती “व्देषजनक” आणि अशोभनिय असून. अशा प्रकारे कार्यकर्त्याची खिल्ली उडवणे म्हणजे त्यांनी नैराश्यातून केलेले वक्तव्य असल्याची टिका खा. वसंतराव चव्हाण यांनी केली आहे.

नांदेड महानगरपालिकेने शासकीय निधीतून बांधलेल्या अभ्यासिकेच्या कार्यक्रमात नुतन खासदार वसंतराव चव्हाण यांना डावलण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याप्रकरणी खा. वसंतराव चव्हाण यांनी आक्रमक भुमिका घेतली होती. त्यामुळे महानगरपालिकेची चांगलीच तारांबळ उडाली आणि धावपळ करुन खा.वसंतराव चव्हाण यांचे नाव कार्यक्रम पत्रिकेत समाविष्ट करावे लागले. यानंतर खासदार समर्थकांनी कार्यक्रमातच अशोकराव चव्हाण यांच्यापुढे जोरदार घोषणाबाजी करुन वसंतराव चव्हाण यांच्या समर्थनार्थ नारे दिले. याच विषयाला धरुन अशोकराव चव्हाण यांनी वसंतराव चव्हाण यांच्यावर टिका केली होती.

अशोकराव चव्हाण यांच्या टिकेला एक प्रसिध्द पत्रक काढून वसंतराव चव्हाण यांनी पलटवार केला आहे. विकास कामाच्या बाबतीत त्अशोकराव यांचा अभ्यास इतरांपेक्षा मोठा असाला तरी मागील ५० वर्षापासून याच कार्यकत्यांनी त्यांना “आप आगे बढो हम तुम्हारे साथ है” चा नारा दिला होता म्हणूनच ते मोठे झाले आणि आता त्याच कार्यकत्यांची “खील्ली” उडविणे म्हणजे “काम सरो वैद्य मरो” अशीच प्रवत्ती दिसून येते. मी व माझ्या कार्यकत्यांसाठी अभ्यासिका लोकार्पण सोहळा श्रेय वादाचा नव्हताचं ! शासकीय निधीतून बांधण्यात आलेल्या महापालिकेच्या वास्तुचा लोकार्पण सोहळ्यामध्ये सर्व लोकप्रतीनिधीना समावून घेण्याचा होता. तशी मागणी महापालिका प्रशासनाकडे करण्यात आली होती.

महापालिकेने प्रोटोकॉल विना कार्यक्रम घेतला त्याचा निषेध मी व माझ्या कार्यकत्यांनी नोंदविला हीच बाब त्यांना झोंबली. कारण ते त्या कार्यक्रमाचे उद्घाटक होते या बद्दल आमचा कोणाचाही आक्षेप नव्हता. आक्षेप नसताना सदरचे प्रकरण त्यांनी प्रतिक्रिया देताना अंगावर का ओढून घेतले हे लक्ष्यात येत नाही. त्यांच मोठे पण त्यांचा अभ्यास इतरांपेक्षा मोठा असला तरी एखाद्या विरोधी लोकप्रतिनिधीबद्दल व्देषाने बोलताना स्वत:चे मोठेपण जपायला हवे होते.

मी म्हणजे सर्वकाही आणि इतर लोकप्रतिनिधी बद्दल आकस हे बरोबर नाही. महापालिका प्रशासना विरुद्ध घेतलेली भुमीका योग्य होती आणि ती वैयक्तीक घेण्याचे कारण नव्हते त्यामुळे अशोकराव चव्हाण यांनी नैराश्यातून केलेले वक्तव्य आहे अशी टिका खा.वसंतराव चव्हाण यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker