खासदार वसंतराव पा. चव्हाण यांचे निधन…

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : हैद्राबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या खा. वसंतराव चव्हाण यांची सोमवारी पहाटे प्राणज्योत मालवली. त्याची अचानक तब्येत बिघडल्याने (ता.१३) आँगस्ट रोजी हैद्राबाद येथील किम्स हाँस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पार्थिवावर (ता.२७) रोजी मंगळवारी सकाळी ११ वाजता नायगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
लोकसभा निवडणुकीनंतर पक्षाच्या विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावण्यात आल्याने त्यांची धावपळ झाली होती. त्यामुळे दि.१३ आँगस्ट रोजी सकाळी तब्येत बिघडल्याने अगोदर नांदेड येथील एका खाजगी रुग्णालयात व सायंकाळी हैद्राबाद येथील किम्स रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यासाठी तज्ञ डॉक्टरांचे पथक कार्यरत होते. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असताना दि. २६ आँगस्ट रोजी पहाटे ४.५ मिनिटाला त्यांची प्राणज्योत मालवली.
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेल्याने काँग्रेसचे काय होणार अशी चर्चा होत असताना लोकसभा निवडणूक मी सर्व ताकदीने लढणार असल्याचे जाहीर करुन प्रताप पाटील चिखलीकर यांचा पराभव केला व खा.अशोकराव चव्हाण यांना दणका बसला. खासदार म्हणून निवडूण येण्याअगोदर ते एकदा विधानपरिषदेचे तर दोनदा विधानसभेचे आमदार होते. त्यांची राजकीय कारकीर्द गावच्या सरपंचपदापासून सुरुवात झाली असून ते १९७८ साली पहील्यांदा सरपंच झाले. नंतर पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य तब्बल १६ वर्षे आमदार आणि २०२४ मध्ये लोकसभा सदस्य झाले होते.
मितभाषी व मनमिळाऊ स्वभावामुळे ते जेवढे जनतेत लोकप्रिय होते तेवढेच चव्हाण कुंटंबातही होते. मात्र हैद्राबाद येथील किम्स हाँस्पीटलमध्ये त्यांची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली आणि सोमवारी पहाटे ४.५ मिनिटाला त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर दि. २७ रोजी सकाळी नायगाव येथील हनुमान मंदिराच्या परिसरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.