रत्नाळी व बाळापूर सज्जा अंतर्गत दोन तलाठ्यांनी वर्षभरात पकडली केवळ पाच वाहने…
दररोज सुरू असेलल्या वाहतुकीकडे का केले दुर्लक्ष?

सौ.मीना राजू भद्रे
धर्माबाद :- धर्माबाद शहरात दररोज मुरूम वाळू वाहतूक करणारी अनेक वाहने नियमबाह्य बिनधास्त सुरू आहेत यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी महसूल विभागाचे सज्जा प्रमुख म्हणून रत्नाळी व बाळापूर सज्जा च्या दोन्ही तलाठ्यांची आहे. सदरच्या दोन्ही तलाठ्यांनी वर्षभरात पकडलेली वाहने पाहता दाल में कूछ तो काला है…! असा संशय निर्माण होत आहे.
रत्नाळी सज्जा चे तलाठी म्हणून काम पाहणारे तलाठी नारायण गाजेवार हे दिनांक २८ मे २०१२ पासून आज पर्यंत ते म्हणजेच जवळ जवळ बारा वर्ष धर्माबाद उपविभागातच उमरी आणि धर्माबाद तालुक्यात काम पाहत आहेत. जुलै २०२३ ते अगस्ट २०२४ अशा वर्षभरात केवळ चार वाहने पकडली असून त्यातून शासनाला ६ लाख ५७ हजार सहाशे रुपये महसूल प्राप्त झाला आहे तसेच बाळापूर सज्जा चे तलाठी म्हणून काम पाहणारे तलाठी अनिल देवापूरे मात्र केवळ एकच वाहन पकडले आणि त्यातून शासनाला २ लाख १९ हजार रुपये महसूल प्राप्त झाला आहे.
वर्षभर वाळू मुरूम वाहतूक चालूच असते आणि दोन तलाठ्यांनी केवळ पाच वाहने पकडली म्हणजे इतर सगळी सुसाट धावणारी वाहने तलाठ्याना दिसली नव्हती की करवाई करणे गरजेचे वाटले नाही याबद्दल जनतेत वेगवेगळे प्रश्न उपस्थित केल्या जात आहेत. तालुक्यातील मुरूम वाळू माफियांना आवर घालण्यासाठी अपयशी ठरलेल्या दोन्ही तलाठ्यांची चौकशी करून या ठिकाणीं जिल्हाधिकारी साहेबांनी कर्तव्यदक्ष तलाठी नियुक्त करावे करावे अशी मागणी माहिती अधिकार संरक्षण समिती तालुका अध्यक्ष सौ मीना राजू भद्रे यांनी केली आहे.