देगलूर-बिलोली 90 मतदारसंघ… अंतापुरकर व साबणे यांना निवडणुकीपासून दूर ठेवा…
नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची मागणी...

दिलीप वाघमारे
बिलोली : देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्यापासून अंतापुरकर व साबणे या जोडीने सत्तेची फळे चाखत पूर्ण मतदारसंघाची वाट लावली आहे. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत या दोन्ही भ्रष्ट माजी आमदाराना राजकारणात आता “एन्ट्री” नकोचा नारा मतदारांनी दिला आहे. त्यामुळे प्रतिस्पर्धी पक्षश्रेष्ठींनी नवीन चेहऱ्याला संधी द्यावी अशी मागणी पुढे येत आहे.
देगलूर बिलोली हा मतदार संघ 2009 मध्ये राखीव झाला. आणि पहिल्याच निवडणुकीत राजकारणाचा कोणताही गंध नसतानाही “खोक्याच्या” जोरावर रावसाहेब अंतापुरकर यांना माजी राज्यमंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांनी विधानसभेत पाठवले. दोन टर्म अंतापुरकर हे फक्त रबरी स्टॅम्प ची भूमिका निभावली. त्यानंतर एक टर्म सुभाष साबणे यांनी या मतदारसंघावर राज्य केले मात्र त्यांनी जनतेच्या विकासापेक्षा स्वतःच्याच विकासाला प्राधान्य देत गडगंज प्रॉपर्टी जमा केली. यामध्ये त्यांच्या दिवट्या पुत्राचा मोठा सिंहाचा वाटा आहे. कोणतेही सेटलमेंट असो अथवा बदली प्रकरण…. ‘आर्थिक’ उलाढाल झाल्याशिवाय फाईल पुढे सरकण्याची नाव घेत नव्हती.
त्यामुळे त्यांची एवढी नाचकी झाली की साबणे यांना दोन-तीन टर्म सपाटून मार खावा लागला. यावर अजूनही बोध न घेता सत्तेचे फळ चाखण्यासाठी आता काँग्रेस पक्षाचे तसेच शरद पवार गटाच्या तुतारीचे बाजे वाजविण्यासाठी या पक्षातून त्या पक्षातून कोलांटउड्या मारण्यातच ते तूर्त तरी मग्न आहेत. तथापि शिवसेना, भाजप सोडून काँग्रेस व तुतारीच्या नादी लागले आहेत. जाती निहाय मतदारांचा विचार केल्यास साबणे यांच्या जातीचे किती मते आहेत ? याचा विचार करणे पक्षश्रेष्ठींनी गरजेचे बनले आहे.
सध्या महायुतीपेक्षा महाविकास आघाडीकडे उमेदवारी मागण्याचा लोंढा वाढला आहे. जे की काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठी 30 ते 40 इच्छुक जणांची यादी आहे. त्यामुळे सुभाष साबणे यांची काँग्रेस पक्षाकडे दाळ शिजल असे वाटत नाही. त्यामुळे ते तुतारी गटाकडेही आपला मोर्चा वळविल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे या आयाराम गयारामामुळेच आज पर्यंत स्थानिक बौद्ध समाजाला कोणत्याही पक्षांनी उमेदवारी दिली नाही. त्यामुळे बौद्ध समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागण्याची किटकिट त्यांच्यासमोर आ वासून उभे राहिले आहे.
एकंदरीत काँग्रेसमध्ये राहून अंतापुरकर यांनी कवडीचा ही मतदारसंघाचा विकास केला नाही. फक्त मायबाप…. जनता.. माय बाप … अशी भावनिक साद मतदार राजाला घालून’ चुना ‘लावण्याचे काम करून अब्ज रुपये वरकमाई केला आहे. पुढची नौटंकी म्हणजे ते चव्हाण व राजूरकर कुटुंबाचे चपल्या उचलण्याचे काम आज पर्यंत करीत असल्याचे दिसून येत आहे. आता पुन्हा काँग्रेस पक्षातून भाजपात प्रवेश केला त्यामुळे भाजपाकडून जितेश अंतापुरकर यांना उमेदवारी मिळेल की नाही याची पूर्णता शाश्वती दिसून येत नाही. सर्वे अंतापुरकर बाजूंच्या पूर्णता विरोधात असल्याचे सांगण्यात येते.
त्यामुळे भाजपाने सावधगिरीची भूमिका निभावून एखाद्या नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात यावी असेही मागणी पुढे येत आहे. या ऊपर ही भाजपाने अंतापुरकर यांना उमेदवारी दिली तरी देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघातील मतदार राजा अंतापुरकरच काय दस्तुरखुद खासदार अशोकराव चव्हाण देखील या मतदार संघातून निवडणूक लढविल्यास त्यांनाही पराभव पत्करावा लागेल इतका रोष अंतापुरकर पर्यायाने चव्हाण यांच्यावर तूर्त तरी दिसून येत आहे.
त्यामुळे ज्या त्यापक्षश्रेष्ठींनी अंतापुरकर व साबणे या जोड गोळी माजी आमदारांना डावलून एका नवीन चेहऱ्यांना संधी उपलब्ध करून दिल्यास नक्कीच मतदार संघाचा कायापालट होईल असे जनतेमधून व्यक्त केले जात आहे.
अंतापुरकरांच्या पोटनिवडणुकीत चव्हाण यांच्या चपल्या खचल्या…
काँग्रेसचे तत्कालीन आमदार रावसाहेब अंतापुरकर यांचे कोरोना काळामध्ये निधन झाले होते. त्यांच्या रिक्त पदावरील पोटनिवडणूकीत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना अक्षरशः गल्ललो गल्ली, दारू वाले, मटकेवाले, जुगार वाले, यांच्या दारोदारी भटकून मते मागण्याची मोठी नामुसकी ओढवली होती. चव्हाण यांच्या राजकीय कार्यकाळात कधी नव्हे ते एवढी मेहनत त्यांना घ्यावे लागले होते. यावेळी त्यांच्या पायाच्या चकल्या खचल्या गेल्या होत्या. मात्र ज्या उद्देशाने चव्हाण यांनी जितेश यांना निवडून आणले त्याच्या एक पैशाचे देखील काम जितेश अंतापुरकर यांनी केले नाही त्यामुळे मतदारांचा रोष मोठा अंतापुरकर यांच्यावर दिसून येत आहे.
जरांगे फॅक्टर चालणार…
सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर असताना विधानसभेत अंतापुरकर कधीही याबाबत ‘ब्र’ शब्द उच्चारले नाहीत. तर सुभाष साबणे यांनी बाहेरून तरी सकल मराठा समाज बांधवांना न्याय देण्यासाठी पक्षश्रेष्ठीकडे पाठपुरा केल्याचे आढळून येत नाही. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ज्या त्या पक्षाने या दोन्ही भ्रष्ट आमदारांना उमेदवारी दिल्यास त्यांचा नक्कीच मराठा सकल समाज बांधवांनी पायउत्तर करेल यात तीळ मात्र शंका दिसून येत नाही. हे विशेष होय…!