ताज्या बातम्यानांदेडनायगांव

नायगाव तहसीलदारांची धाडसी कारवाई : रेतीचा अवैध उपसा करणाऱ्या दोन बोटी उद्धव करुन माफीयांना दिला दणका

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : महसूल विभागाच्या नाकावर टिच्चून अवैध रेतीचा उपसा करणाऱ्या दोन बोटी नायगावच्या तहसीलदारांनी गुरुवारी उद्धव केल्या. महसूल विभागाने धाडसी कारवाई करुन लाखो रुपयाच्या बोटी उद्धव करुन रेती माफीयांचे कंबरडे मोडले आहे. विशेष म्हणजे पोलीस यंत्रणेचा कुठलाही सपोर्ट नसताना महसूल विभागाने नियोजन करुन व जिद्दीने केलेल्या कारवाईचे कौतुक होत आहे.

बरबडा शिवारातील टाकळी व बरबडा वाडी परिसरात गोदावरी नदी पात्रात बोटीच्या सहाय्याने अवैध वाळूचा उपसा होत असल्याची माहिती तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांना मिळाली. त्यामुळे त्यांनी यापूर्वी दोनदा कारवाई करण्याचा प्रयत्न केला पण महसूलचे पथक आले की बोट नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर म्हणजे मुदखेड तालुक्यात घेवून जायचे. माफीयांची चालाखी ओळखून तहसीलदार गायकवाड यांनी नांदेडवरुन एक बोट मागवली व बुधवारी रात्री दहा वाजताच्या दरम्यान चार तलाठी, तीन मंडळ अधिकारी आणि काही कर्मचारी घेवून त्यांनी थेट बोटीतून गोदावरी नदी पात्रात गेले.

टाकळी व शिवारात एक मोठी बोट व दुसरी छोटी बोट वाळूचा उपसा करताना दिसून आली. त्यामुळे महसूलच्या पथकाने अगोदर बोट चालकाजवळील मोबाईल ताब्यात घेतले. त्यानंतर दोन्ही बोटी बरबडा वाडी शिवारात आणल्या. यादरम्यान बोट चालकाने पुन्हा चलाखी करण्याचा प्रयत्न केला पण महसूलच्या पथकाने जीव धोक्यात घालून माफीयांचे मनसुबे उधळून लावले. याबाबत वरिष्ठांना माहिती दिली त्याचबरोबर कुंटूर पोलिसांनाही माहिती दिली पण त्यांनी महसूल विभागाच्या कारवाईला मदत केली नाही. तरीही महसूल विभागाने जिद्दीने माफीयांचे कंबरडे मोडण्याचे काम केले.

तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांनी आपल्या साथीदाराला कार्यवाहीची भनक सुद्धा लागू दिली नाही. नांदेड येथील बोट व काही माणसांना घेऊन अर्ध्या रात्री तहसीलदार गोदावरीत उतरल्या. मध्यरात्री माफियाच्या बोटीचा पाठलाग करत बोट पकडली अन बरबडा वाडीच्या तिरावर आणण्यात आली.

बोट पकडल्यानंतर महसूल कर्मचारी यांना राखनीला बोलावून घेतले. रात्रभर गोदावरी नदीत खडा पहारा देत संबंधित बाब वरिष्ठाच्या कानावर टाकली. त्यानंतर सकाळी नऊ च्या सुमारास उपजिल्हाधिकारी क्रांती डोंबे यांनी घटना स्थळी भेट देऊन बोट उध्वस्त करण्याची सूचना केली. त्यानुसार दुपारी बारा च्या दरम्यान दोन्ही बोटीवरील इंजिनासह बोट उध्वस्त करण्यात प्रशासनाला यश आले.

ही धाडशी कार्यवाही करण्यासाठी तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड, मंडळ अधिकारी नायगाव इज्जपवार, मं.अ.घुंगराळा एस.बी.आरु, मं.अ.कुंटूर पवार, तलाठी कार्लेकर, येसेकर, हसनपल्ले, हनुमंते, वाहन चालक पुरी, शिवाजी पांचाळ, कोतवाल खनपटे, पोलीस कर्मचारी पी.डी.शिंदे, डी.बी.मुंडकर आदींनी मेहनत घेतली.

दरम्यान स्फोटक लावून उडवण्यात आलेल्या दोन पैकी एक बोट पाण्यात बुडवण्यात आली पण दुसरी बोट मोठी असल्याने बुडाली नसली तरी ती पुन्हा वापरात येवू नये अशी परिस्थिती महसूल विभागाने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker