येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुणालाही घ्या पण ‘त्यांना’ घेवू नका – आ.चिखलीकर

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढत असून आजपर्यंत अनेक दिग्गजांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती घेतले आहे आणि असंख्य येण्यास तयार आहेत. भविष्यात पक्षात कुणाला घ्यायचे आणि कुणाला नाही याचा निर्णय जिल्हाध्यक्षांनी घ्यावा. मात्र ‘त्यांना’ पक्षात घेवू नका धर्माधिकारी यांच्याकडे उंगलीनिर्देश करत मिश्किल टोला नाव न घेता आ. प्रताप पाटील चिखलीकर यांनी अशोक चव्हांणांना लगावला.

नायगाव येथील हेडगेवार चौकात शिवराज होटाळकर यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार गट) मेळावा, पक्ष प्रवेश व सदस्य नोंदणी अभियान सुरु केले. या कार्यक्रमाला आ.प्रताप पाटील चिखलीकर यांची प्रमुख उपस्थिती होती तर अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी होते. यावेळी वसंत सुगावे, उत्तमराव सोनकांबळे, विक्रम देशमुख, सभाजीराव मुकनर, अँड. बाळासाहेब सोनकांबळे, दिपक पाटील चोळाखेकर, ज्ञानेश्वर पाटील कदम, हौसाजी पा.शिंदे, नईम पटेल, बालाजी नागणीकर, जीवन चव्हाण, ज्ञानेश्वर सुरेवाड ओबीसी सेल, बालाजी पा.तळेगावकर, गोपीराज जगदंबे, सुरज पाटील, यादवराव गजभारे, संभाजी माली पाटील, यादवराव तुडमे अदिंची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना आ. चिखलीकर म्हणाले की, पक्षाच्या मेळाव्याची सुरुवात भोकरपासून केली, कारण कार्यकर्त्यांचा आग्रह होता. परंतु अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला आणि प्रवेशही झाले. मी कधीच एका चिन्हावर निवडणूक लढवली नसतांनाही प्रत्येक वेळी निवडून आलो परिस्थितीनुसार पक्ष बदलावे लागले पण मला कुणाचाही दबाव नव्हता मात्र काहींनी दबावामुळे पक्ष बदलेलेत अशी बोचरी टिका चिखलीकरांनी केली. दबावाखाली पक्ष बदलणाऱ्यांनी बदललेत, माझ्यावर तर कुणाचाही दबाव नव्हता, मी कुठेही उभ राहील तर माझा पराभव करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. पण मतदारांशी माझे असलेले नाते हा माझ्यासाठी प्लस पाँईंट राहीलेला आहे.
नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी नंबर एकचा पक्ष होईल जिल्ह्यातील अनेक दिग्गजांचा प्रवेश झाला आहे, पुढच्या काळात पक्षात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे त्यामुळे कुणाला प्रवेश द्यायचा आणि कुणाला नाही याचा निर्णय जिल्हाध्यक्ष म्हणून दिलीपराव धर्माधिकारी यांनी घ्यायचा आहे. त्यांनी कुणालाही घ्या परंतु ‘त्यांना’ पक्षात संधी देवू नका असा मिश्किल टोला आ. चिखलीकरांनी अशोक चव्हांणांना लागवला आहे. पक्षात जुन्यांचा सन्मान तर राखला जाईलच पण नव्याने येणाऱ्यांचेही स्वागत करण्यात येईल असे यावेळी आ. चिखलीकरांनी आवर्जून सांगितले.
या कार्यक्रमास श्रीकांत शिंदे, जीवन चव्हाण, प्रदीप पवळे, गंगाजी पाटील, आनंदराव शिंदे, रमेश पाटील, आनंद पाटील, अंकुश हनमंते, सटवाजी मोदलवाड, प्रदीप देमेवार, सचिन बेंद्रीकर, विशाल शिंदे, कैलास वडगावकर, शिवाजी होटाळकर, प्रभाकर मोरे, गणेश पवार, बाबूराव कार्लेकर, नारायण पवार, बालाजी पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसला पुर्ववैभव मिळवून देण्याचा प्रयत्न – होटाळकर
यावेळी सदस्य नोंदणी अभियानाचे आयोजक शिवराज पाटील होटाळकर यांनी मनोगत व्यक्त करतांना पक्षात कार्यकर्त्यांची कदर करणारे नेते आहेत. कर्यकर्ते जोपासणारे व बळ देणारे नेते आहेत. कार्यकर्त्याला मोठ करणारा पक्ष असून नायगाव विधानसभा मतदारसंघात राज्यात सर्वात जास्त नोंदणी करण्याचा मानस आहे, गाव तिथ शाखा व घर तेथे पक्ष न्यायचा आहे. मतदारसंघातील 80 टक्के गावात पक्ष बांधणी 3 महिण्यातच करण्याचा निर्धार व्यक्त केला पुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची मतदारसंघात मोठी ताकद होती. तेच दिवस परत आणायचे आहेत. गावा गावात व घरोघरी पक्ष पोहचवायचा आहे असे सांगितले.
याप्रसंगी डॉ.जीवन चव्हाण, वसंत सुगावे, विक्रम देशमुख यांनीही मनोगत व्यक्त केले तर धर्माधिकारी यांनी अध्यक्षीय समारोप केला.