गावाकडच्या बातम्यानांदेडनायगांव

सत्त्याहत्तर वर्षाची परंपरा असलेल्या मानाच्या ‘श्री’ ची स्थापना

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : स्वातंत्र्य पुर्व काळापासून १९४७ पासून म्हणजेच मागील ७७ वर्षाची परंपरा असलेल्या मानाच्या ‘श्री’ ची स्थापना नायगाव येथे दुपारी करण्यात आली आहे.
नायगाव येथे १९४७ साली सार्वजनिक गणपतीची स्थापना करण्याची परंपरा सुरु झाली ती आजतागायत कायम असून यंदा २०२४ च्या ‘श्री’ च्या स्थापनेचे ७७ वे वर्ष आहे.

मानाच्या ‘श्री’ च्या आकारा दिवसाच्या काळात येथे विविध उपक्रम होत असत आणि विसर्जनाच्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. कालांतराने उपक्रम बंद झाले असले तरी महाप्रसादाची परंपरा मात्र आजही कायम असून. ‘श्री’ विसरूनाच्या नंतर मोंढा परिसरात महाप्रसाद वाटप करण्यात येतो.

नायगाव शहरात दरवर्षी २० ते २५ गणपतींची स्थापना होते. पण ‘श्री’ विसर्जनाच्या दिवशी मानाच्या गणपतीची मिरवणूक निघाल्यानंतरच अन्य गणपतीच्या विसर्जन मिरवणूका निघतात. मानाच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक टाळ, मृदंग वाजवात आणि भजन करत पालखीतून निघते ज्या मार्गावरून हि मिरवणूक जाते त्या मार्गावर दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी होते.

अतिशय भक्तीभावाने मिरवणूक निघाल्यानंतर अगोदर मानाच्या गणपतीचे विसर्जन होते. मानाच्या गणपतीची ७७ वर्षाची ऐतिहासिक परंपरा असल्याने आकारा दिवसाच्या काळात दर्शन घेण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker