नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे मुंबईत पक्ष कार्यालयात जोरदार स्वागत

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण हे निवडून आल्यानंतर पहील्यांदाच शुक्रवारी मुंबईत गेल्यानंतर पक्ष कार्यालयात त्यांचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार स्वागत केले.
नांदेड लोकसभेची लढाई ही वसंतराव चव्हाण प्रताप पाटील चिखलीकर यांच्यात न होता ती खा.अशोकराव चव्हाण यांच्या अस्तित्वाची लढाई होती. त्यामुळे या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले होते विशेषतः काँग्रेसचे पण वसंतराव चव्हाण यांनी चिखलीकरांचा पराभव करुन बाजीगर ठरले. या लोकसभा निवडणुकीने भाजपचे मोठे नुकसान झालेच पण खा. अशोकराव चव्हाण यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा पराभव ठरला आहे.
जिल्ह्यातील राजकारणावर आपले वर्चस्व ठेवून असल्याने आपल्याला कुणीही आव्हान देवू शकत नाही या भ्रमात असलेल्या अशोकरावांना भविष्यात नांदेड जिल्ह्यात आपले अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड करावी लागणार आहे. ज्यांच्यामुळे पराभव झाला हे शल्य विसरुन अशोकराव हे भाजपवासी झाले हीच बाब त्यांच्या समर्थकांना आणि मतदारांना पटली नाही. त्यामुळे मतदारांनी चिखलीकरांचा तर पराभव केलाच पण अशोकराव चव्हाणांनाही आत्मचिंतन करण्याची वेळ आणली आहे.
नांदेड लोकसभेत दणदणीत विजय मिळवल्यानंतर ते शुक्रवारी सकाळी मुंबईत पोहचले. यावेळी त्यांचे पक्ष कार्यालयात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार स्वागत केले व पुष्पगुच्छ देवून शुभेच्छा दिल्या. यावेळी काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, प्रथ्विराज चव्हाण, कांग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला जी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले, मा.मूख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मा.मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, खा.छत्रपती शाहू महाराज विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार, खा.चंद्रकांत हांडोरे यांच्यासह राज्यातील अनेक दिग्गज उपस्थित होते.
तर नायगाव येथून इश्वरराव भोसीकर, नगर पंचायतचे उपाध्यक्ष विजय चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती संजय बेळगे, पंचायत समितीचे माजी सभापती सय्यद रहीम, अभिनेते सुनील मोरे, दत्ता येवते, केदार साळुंखे, पावडे यांच्यासह अनेकजन उपस्थित होते.