ताज्या बातम्यानांदेडनायगांव

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे न करता हेक्टरी पन्नास हजार मदत द्यावी

अखिल भारतीय छावा संघटना नायगाव

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळदार व अतिवृष्टी दर्श धो-धो पाऊस पडत असल्यामुळे शेतीतील शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. कापुस, सोयाबिन, उडीद, ज्वारी, तुर या पिकांची आणि गाई, गोठे, पशुधनाची जिवित हाणी झाले आहे. त्याचबरोबर घरांचेही नुकसान झाले आहे.

तालुक्यातील सर्व महसुल मंडळ निहाय तलाठी व ग्रामसेवक यांना पंचनामा करण्याकरीता आदेश न काढता विना विलंब सरसकट शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मोबदला देण्यात यावा अशी मागणी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने तहसीलदार नायगाव यांचेकडे करण्यात आली आहे.

यावेळी छावाचे तालुकाध्यक्ष प्रताप पाटील सोमठाणकर, हणमंत पाटील शिंदे, छावाचे ता.संपर्क प्रमुख साई पाटील देगावकर, सोनालीताई हंबर्डे, साई पाटील मोकासदरेकर, सतीश पाटील हिप्परगेकर, गजानन पाटील हिप्परगेकर, प्रदीप पाटील उपासे, व्यंकट पाटील सोमठाणकर, छत्रपती पाटील मोरे, बंडू पाटील अंचोलीकर, मारुती पाटील सोमठाणकर, नामदेव पाटील पवळे व असंख्य छावाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker