कुंडलवाडी नगरपरिषदेच्या स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण वेळेबाबत नागरिकांची तीव्र नाराजी

New Bharat Times नेटवर्क
कुंडलवाडी :- कुंडलवाडी नगरपरिषद प्रशासनाकडून १५ आँगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण कार्यक्रम सकाळी ७:३० वाजता ठेवण्यात आला आहे. नगरपालिका प्रशासन यापूर्वी १० वाजून ०५ मिनिटांनी नगरपालिकेचा मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम ठेवण्यात येत होता. पण प्रशासकाच्या सोयीनुसार हा कार्यक्रम ठेवण्यात येत असल्याने शहरातील शाळकरी मुले, नागरिकांना ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित राहता येत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून देशभरात उत्साहात साजरा केला जातो. कुंडलवाडी नगरपालिकेच्या प्रांगणातही शहरातील मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम दरवर्षी पार पडतो. गत अडीच वर्षापासून नगरपालिका च्या निवडणुका झाल्या नसल्याने सध्या नगरपालिकेवर प्रशासक राज आहे.
प्रशासक म्हणून बिलोली येथील उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे तर प्रभारी मुख्याधिकारी म्हणून धर्माबाद नगरपालिकेचे मुख्याधिकारी सतीश पुदाके काम पाहत आहेत. सकाळी ७:३० वाजेच्या सुमारास शहरातील शैक्षणिक संस्था,पोलीस ठाणे, सोसायटी, कृषी उत्पन्न बाजार समिती, प्राथमिक आरोग्य केंद्र आदी ठिकाणी ध्वजारोहण कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.
प्रशासक राजवटी पूर्वी नगरपालिकेचा ध्वजारोहण कार्यक्रम १० वाजून ०५ मिनिटांनी ठेवण्यात येत होता.पण प्रशासक राजवटीत मात्र प्रशासकांच्या सोयीनुसार ध्वजारोहणाची वेळ ठेवण्यात येत असल्याने कुंडलवाडी शहरातील नागरिकांना,शालेय विद्यार्थ्यांना देशाच्या स्वातंत्र्याच्या शहरातील मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित राहता येत नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
प्रशासक राजवटीपूर्वी शहरातील विविध शाळांतील विद्यार्थी राष्ट्राबद्दल प्रेमाची भावना प्रभात फेरीतून व्यक्त करीत होते. नगरपालिकेत ध्वजारोहण कार्यक्रम नंतर प्रभात फेरीचा समारोप होत होता. नगरपालिकेने शाळेच्या वेळेनुसारच ध्वजारोहण कार्यक्रमासोबतच प्रभात फेरीही काढण्यात येत नसल्याने शालेय विद्यार्थीही नगरपालिकेच्या ध्वजारोहणाच्या वेळेबाबत नाराजी व्यक्त करीत आहेत.
◆याबाबत नगरपालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी सतीश पुदाके यांना विचारणा केली असता, १५ आँगस्ट स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहण कार्यक्रम यापूर्वीचे प्रभारी मुख्याधिकारी व प्रशासक यांनी ठेवल्याप्रमाणेच ध्वजारोहणाची वेळ ठेवण्यात आली असून नागरिकांना ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित राहता येत नसल्यास आगामी काळातील राष्ट्रीय ध्वजारोहणाची वेळ ही नागरिकांच्या, शालेय विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार ठेवण्यात येईल असे दैनिक सामनाशी बोलताना प्रभारी मुख्याधिकारी सतीश पुदाके यांनी सांगितले आहे.
◆ देशाच्या स्वातंत्र्य दिनाचा शहरातील नगरपरिषद प्रांगणात ध्वजारोहण कार्यक्रम दरवर्षी ठेवला जातो. यातून राष्ट्रा बद्दलची प्रेमाची भावना निर्माण होते. नगरपालिकेत शहरातील शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढून न.प.तील ध्वजारोहण कार्यक्रमानंतर प्रभात फेरीचा समारोप होतो. यातून शालेय विद्यार्थ्यांना राष्ट्र प्रेमाची भावना निर्माण होते. प्रशासक राजवटीत मात्र त्यांच्या सोयीनुसार ध्वजारोहणाची वेळ ठेवण्यात येत नसल्याने शहरातील नागरिक व शालेय विद्यार्थ्यांना ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित राहता येत नाही. याकडे प्रशासकांनी गांभीर्याने लक्ष द्यावे.
आगामी काळातील राष्ट्रीय सण, उत्सव हे नागरिकांच्या सोयीनुसार ध्वजारोहण कार्यक्रम ठेवण्यात यावे असे माजी नगराध्यक्ष सुनील बेजगमवार यांनी सांगितले आहे.