चिटमोगरा येथे तलावात बुडून शेतकऱ्याचा मृत्यू

मोरे मनोहर
किनाळा :- येथून जवळच असलेल्या मौजे चिटमोगरा ता.बिलोली येथे सोयाबीन फवारण्यासाठी गेलेल्या शिवाजी मलबा काळेकर वय 35 हे शेतापासून जवळच असलेल्या तलावातून पाणी आणण्यासाठी गेले असता त्यांचा पाय घसरून तलावातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना दि.16 ऑगस्ट रोजी घडली असून त्यांच्या या अकाली निधनाने गावभर शोककळा पसरली आहे.
सविस्तर माहिती अशी की चिटमोगरा येथील शिवाजी मलबा काळेकर वय 35 वर्षे हे दि.16 ऑगस्ट रोजी दुपारी शेतातील सोयाबीन फवारण्यासाठी शेतापासून जवळच असलेल्या तलावातून फवारणीसाठी पाणी आणण्यासाठी गेले असता शिवाजी मलबा काळेकर यांचा पाय घसरून तलावात पडून मृत्यू झाला तलावात पाणी जास्त असल्याने काल पासून त्यांचा शोध घेतले मात्र त्यांचा थांग पत्ता लागला नाही परंतु दुसऱ्या दिवशी 17 ऑगस्ट रोजी अनेकांनी प्रयत्न करून सकाळी दहा वाजता अखेर मृत्यदेह तलावातुन बाहेर काढाव्यात यशस्वी झाले हा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आल्यानंतर त्यांचे नायगाव येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून चिटमोगरा येथे शोकाकुल वातावरणात सायंकाळी अंत्यविधी करण्यात आला.
या घडलेल्या घटनेची माहिती रामतीर्थ पोलिसांना कळवले असता रामतीर्थ पोलीस स्टेशनचे सपोनी श्रीधर जगताप आपल्या पोलिस कर्मचाऱ्यांसह अघटनास्थळी धाव घेऊन या घटनेचा पंचनामा करून या घटनेची अकस्मीत मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस जमादार शिंदे हे करीत आहेत. शिवाजी मलबा काळेकर यांच्या पश्चात पत्नी तिन मुली एक मुलगा असा परिवार असून त्यांच्या घरातील कुटूंबाचा अचानक आधार गेल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून. त्यांच्या या कुटुंबीयांना शासनाने आर्थिक मदत करावे अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.