कुंडलवाडी शहरातील समस्या सोडविण्यासाठी नागरिकांचे मुख्याधिका-यांना निवेदन

कुंडलवाडी प्रतिनिधी :- गत अडीच वर्षापासून कुंडलवाडी नगर परिषदेवर प्रशासक राज असल्याने अनेक विकास कामांचा खोळंबा होत आहे. यातच अनेक समस्या ही मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्याने आज दि.२३ आँगस्ट रोजी शहरातील नागरिकांतर्फे नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन समस्या सोडवण्याची मागणी करण्यात आली आहे.
नागरिकांनी नगरपालिकेला दिलेल्या निवेदनात नागणी रोड स्मशानभूमी येथे पाण्याची टाकी, नळ बसविणे व दहन स्टॅन्ड उभी करण्यात यावे, नगरपरिषद स्मशानभूमी येथे टीन शेड नवीन बसविण्यात यावे, नवीन पोलीस स्टेशन ते व्यंकटेश्वर मंदिर, नरागल्ली सरळ रस्ता जागोजागी गतिरोधक उभारण्यात यावे, वंजार गल्ली येथील तीन ठिकाणी नाली वरचा स्लॅब नवीन टाकण्यात यावे.
तसेच गावामध्ये सर्व प्रभागात नाली साफसफाई करण्याची मागणी करण्यात आली आहे निवेदनावर शहरातील नागरिक सय्याराम मुक्केरवार, शिवा खांडरे, साई माहेवार,परशुराम गंगोणे,साई भोकरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.