संविधान आपल्या जगण्याचे साधन आहे… संविधानाला इजा पोहोचू नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे – प्रा.विठ्ठल कांगणे

अनिल कांबळे
कुंटूर :- नायगाव तालुक्यातील कुंटूर येथे संविधान जागृती महोत्सव 2024 कार्यक्रमानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये प्रा.विठ्ठल कांगणे सर यांचे व्याख्यान होते. विठ्ठल कांगणे सर यांनी आपल्या भाषणांमध्ये आई वडिलांची सेवा करावी आई वडिलांच्या व्यतिरिक्त कोण्या नेत्याला देव मानू नये. परिस्थितीची लाज वाटावी परिस्थितीवर मात करून काहीतरी नोकरी व्यवसायांमध्ये परिस्थिती सुधारल्यानंतर बनल्यानंतर आई वडिलांचे शेवा करावी. असे विद्यार्थ्याला आव्हान केले आहे.

जगात शिक्षण घेऊन चांगल्या पदावर जाऊन नोकरी करून आई वडिलांचे सेवा करावी हीच आपल्यासाठी खरी सेवा असून परिवाराकडे लक्ष देण्यात यावे असे, सविधान हे आपला महत्त्वाचा ग्रंथ असून ह्या ग्रंथाप्रमाणेच भारत देशातील सर्व नागरिकांना स्वतंत्र राहणे स्वतंत्र जगण्याचा व भाषा बोलण्याच स्वतंत्र, जगण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे, समान नागरकांना नियम लागू करण्यात आला आहे. त्यामुळे हे संविधान आपल्या जगण्याचे साधन आहे. संविधानाला इजा पोहोचू नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे मनोगत. प्रा.विठ्ठल कागणे सर यांनी व्यक्त केले आहे. कुंटूर येथील संविधान जागृती महोत्सवाच्या कार्यक्रमानिमित्त बोलत होते.

यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नायगाव तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून रफिक शेख पोलीस उपविभागीय अधिकारी बिलोली, पोलीस निरीक्षक कुंटूर बाळकृष्ण पाटील, गावातील प्रमुख रुपेश देशमुख कुंटूरकर, डॉ.विलास पवार तांडा, मंगेश हनवटे केंद्रप्रमुख कुंटूर, सुधाकर झुंजारे, के.टी.हमनते, प्रकाश महिपाळे, गंगाधर ढवळे पत्रकार, अमोल जोंधळे तालुका अभियान व्यवस्थापक, गौतम जोंधळे सातेगावकर रोहिदास गायकवाड सैनिक, मधुकर जोंधळे इकळीमाळ सैनिक, गंगाधर झगडे- सैनिक भारतीय बौद्ध महासभा, बाळू दगडूमवार कवी लेखक, देवराव नारे ग्रामपंचायत सदस्य डोंगरगाव, विनोद झुंजारे, गावातील प्रमुख व्यक्ती महिला पुरुष व्यक्ती उपस्थित होते. यावेळी गावातून नागरिक महिला बचत गटाच्या महिला उपस्थित होते.

यावेळी उत्कृष्ट तलाठी एस.काळे, उत्कृष्ट ग्रामविकास अधिकारी मिलिंद जोंधळे, उत्कृष्ट पोलीस एस आय निकम, उत्कृष्ट पत्रकार देवदास जेठेवाड, तानाजी शेळगावकर पत्रकार, उत्कृष्ट महिला बचत गट महालक्ष्मी, गिरजा माय महिला बचत गट यांच्या उत्कृष्ट घोंगडी व्यवसाय म्हणून उत्कृष्ट म्हणून त्यांना यावेळी सन्मान चिन्ह ट्रॉफी व पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सर्व नागरिकांना व महिला पुरुषांना आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिली संविधान हे महिला पुरुष आवाना एकत्र व सर्वांना समान अधिकार देण्यात आलेला आहे.

त्यामुळे संविधानाने जनजागृती होणे गरजेचे असून अशी कार्यक्रम घेणे. ही गरजेचे आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका संघटित व संघर्ष करा हा मूलमंत्र सर्वांना दिला आहे. त्या मूलमंत्र्याप्रमाणे आपल्या मुलांना शिक्षण शिकवा नोकरी व्यवसायामध्ये कामाला लावा व आपल्या परिवाराची उन्नती साधा असे मत तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांनी व्यक्त केली. यावेळी गावातील व परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळू दुगडूमवार, तर प्रास्ताविक विनोद झुंजारे यांनी केले.
या कार्यक्रमाचे आयोजक बालाजी हणमंते, माधव धडेकर, अनिल कांबळे, मालोजी झगडे, प्रकाश महिपाळे, साहेबराव धसाडे, गौतम जोंधळे सातेगावकर यावेळी परिसरातील भारतीय बौद्ध महासभेचे सैनिक उपस्थित होते. त्यांनी या कार्यक्रमात आलेल्या सर्व महिला पुरुष व बालकांचे सुरक्षेची जबाबदारी घेतली होती त्यांनाही सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.