बँक ऑफ इंडिया व उमेद अभियानाच्या माध्यमातून महिलांना तीन कोटी 17 लक्ष वितरित…

New Bharat Times नेटवर्क
नायगाव :- दिनांक 10 सप्टेंबर रोजी नायगाव येथील बँक ऑफ इंडिया व उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती नायगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने बँक ऑफ इंडिया च्या माध्यमातून महिलांना आर्थिक सहाय्य म्हणून 74 समूहांना 3 कोटी 17 लक्ष कर्ज स्वरूपात वितरित करण्यात आलेले आहे.
बँक ऑफ इंडिया चा 119 वा वर्धापन दिन व नायगाव येथील बँक ऑफ इंडिया शाखेचा 14 वा वर्धापन दिनाच्या निमित्ताने नायगाव तालुक्यातील उमेद अभियानाच्या माध्यमातून महिला स्वयंसहायता समूहांना हे आर्थिक संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

उमेद अभियानाच्या माध्यमातून महिला या आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊन त्या स्वयं रोजगाराला लागाव्यात व ते उद्योजक म्हणून पुढे यावेत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून उमेदच्या माध्यमातून महिलांचं आर्थिक स्तर उंचावला जात आहे म्हणूनच नायगाव तालुक्यातील उमेद अभियानाच्या विभागामार्फत महिलांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याचं काम करण्यात आलेल आहे.
जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद नांदेड चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करणवाल मॅडम तसेच जिल्हा अभियान सहसंचालक डॉ. संजय तुबाकले सर, जिल्हा अभियान व्यवस्थापक श्री.गजानन पातेवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती नायगाव चे गटविकास अधिकारी श्री लक्ष्मण वाजे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अभियान व्यवस्थापक श्री.अमोल जोंधळे, तालुका व्यवस्थापक श्री. बाबू डोळे, तालुका व्यवस्थापक श्री. इरवंत सुर्यकार, यांनी हा बँक मेळावा उपलब्ध करून देण्यासाठी मेहनत घेतलेली आहे.
सदरील कार्यक्रमाचे आयोजक व नियोजक बँक व्यवस्थापक अन्नाराव राठोड तसेच सुनील येरसनवार (फिल्ड ऑफिसर ), प्रभाकर जाधव, धर्मराज सिद्धमवार, लल्लेश दखलवार, प्रकाश गोजे, आकाश येलावार, जे सि जगदाळे
बँक ऑफ इंडियाच्या 119 ला वर्धापन व नायगांव शाखेच्या 14 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने 75 समूहांना तीन कोटी दहा लक्ष वितरित करण्यात आलेले आहे.
सर्वप्रथम मान्यवरांचे स्वागत उमेद अभियानाच्या वतीने करण्यात आले त्यानंतर दीप प्रज्वलन करून व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली समुहाच्या महिलांनी स्फूर्ती गीत व स्वागत गीत उमेद अभियानाचा समूह संसाधन व्यक्ती यांनी गायले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विभागीय व्यवस्थापक सोलापूर श्री चंद्रशेखर मंत्री हे उपस्थित होते मान्यवरांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली .
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून श्री.राजेश देशमुख कुंटूरकर चेअरमन जय अंबिका सहकारी साखर कारखाना कुंटूर, तसेच जिल्हा अभियान व्यवस्थापक श्री गजानन पातेवार साहेब, जिल्हा व्यवस्थापक श्री गणेश कवडेवार साहेब, जिल्हा व्यवस्थापक श्री माधव भिसे साहेब, सहायक प्रादेशिक व्यवस्थापक श्री.विजयकुमार भोसले सर, श्री. श्रीकांत गुरलेवार वरिष्ठ प्रभाकर नांदेड, श्री.प्रमोद संजय वरिष्ठ अधिकारी, व्हीआयपी रोड नांदेड.
उमेद अभियानातील तालुका अभियान व्यवस्थापक श्री.अमोल जोंधळे, तालुका व्यवस्थापक श्री.इरवंत सुर्यकार, तालुका व्यवस्थापक (आर्थिक समावेशन) श्री.बाबू डोळे, कौशल्य समन्वयक श्री.बालाजी गिरी बँक सखी महानंदा गायकवाड, मायावती सूर्यकार, शिवमाला पंचलिंगे, हरण्याबाई सुरणे, यांच्या माध्यमातून हे आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यात येत आहे.
सदरील कार्यक्रमात घोंगडी चे स्टॉल प्रदर्शनी लावण्यात आली होती. या बँक मेळाव्यासाठी प्रत्येक गावातून समूह संसाधन व्यक्ती म्हणून विशेष सहभाग नोंदविला त्यामध्ये रेखाताई कांबळे, संगीता जाधव,दैवशाला वाघमारे, महानंदा गायकवाड सुनीता बेलूरे, सोनूताई कदम, मीराताई झगडे, ज्योतीताई पोतलवार तसेच समता महिला प्रभाग संघ मांजरमाच्या अध्यक्ष सुनिता उत्तमराव गवाले, सावित्रीबाई फुले महिला प्रभाग संघ नरसी संघाच्या अध्यक्षा तयबा शेख इलाईज. आदिची उपस्थिती होती.
मान्यवरांच्या हस्ते 3 कोटी 17 लक्षाचा धनादेश 74 समूहा समूहाच्या महिलांना वितरित करण्यात आला.