क्राईमताज्या बातम्यानायगांव

आत्महत्येस कारणीभूत असलेले आरोपी विस दिवसापासून मोकाट : कुंटूर पोलीसांच्या कार्य पद्धतीबदल नाराजी

प्रकाश महिपाळे

नायगाव : तालुक्यातील निळेगव्हाण येथील 22 वर्षीय तरुण शामसुंदर जाधव याच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या सात आरोपींना अटक करण्यात तब्बल 20 दिवसापासून टाळाटाळ करत आहेत. आरोपींना अटक का करत नाही याची विचारणा करण्यासाठी गेलेल्या मयताच्या नातेवाईकांनाच कुंटूरचे सहायक पोलीस निरिक्षक रामकृष्ण पाटील अरेरावीची व उद्धट भाषा वापरत आहेत. या प्रकरणी मयताचे नातेवाईक विशेष पोलीस उपमहानिरीक्षक व जिल्हा पोलीस अधिक्षकाकडे तक्रार करणार आहेत.

नायगाव तालुक्यातील निळेगव्हाण येथे दोन मोटारसायकलच्या समोरासमोर झालेल्या अपघातात श्यामसुंदर जाधव व सुनिल जाधव आणि दोघांना मार लागला होता. त्यामुळे दोघावरही खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले पण सुनील जाधव यांच्या नातेवाईकांनी शामसुंदर जाधव यास जबाबदार धरून मारहाण केली व पुर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे शामसुंदर जाधव यांनी व्हिडीओ तयार करुन स्टेटस ठेवला व आत्महत्या केली.

याप्रकरणी 1) सुरेश माधवराव जाधव 2) साहेबराव रामकिशन जाधव 3) आनंदा शेटीबा जाधव 4) हानंमत संतुका जाधव 5) बळी संतुका जाधव 6) कैलास सुधाकर जाधव 7) सुनिल सुरेश जाधव अदिंच्या विरोधात दि. 15 आक्टोबर 2024 रोजी गुन्हा नोंद करण्यात आला.

आत्महत्येस कारणीभूत असलेल्या सात लोकांच्या विरोधात गुन्हा नोंद होवून तब्बल 20 दिवसाचा कालावधी झाला. परंतु कुंटूर पोलिसांना हे आरोपी आजपर्यंत सापडले नाहीत. सापडले नाहीत म्हणण्यापेक्षा तडजोडी करुन त्यांना मोकाट सोडले असल्याचा आरोप होतो आहे.

आत्महत्येस कारणीभूत असलेल्या आरोपींना अटक क करण्यात आली नाही यासाठी मयताचे नातेवाईकांनी कुंटूरचे सहायक पोलीस निरीक्षक रामकृष्ण पाटील यांना विचारणा केली असता ते अरेरावीची व उद्धट भाषा वापरले आहेत. त्यामुळे संतप्त झालेले नातेवाईक विशेष पोलीस उपमहानिरीक्षक व जिल्हा पोलीस अधिक्षकाकडे तक्रार करणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker