देगलूर- बिलोली राखीव असलेल्या विधानसभा मतदारसंघात बौद्धांची मते ठरणार निर्णायक

मोरे मनोहर
किनाळा :- देगलूर बिलोली राखीव असलेल्या विधानसभा मतदारसंघात बौद्धांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी मोठ्या प्रमाणात केली जात असताना या मागणीची दखल राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने घेऊन मतदार संघातील स्थानिक उमेदवार निवृत्तीदादा कांबळे यांना उमेदवारी दिल्याने बौद्धांची मते निर्णायक ठरतील असे चित्र दिसून येत आहे.
पंधरा वर्षापासून राखीव असलेल्या या मतदारसंघात माजी खासदार भास्कररावजी पाटील खतगावकर यांनी काँग्रेस पक्षाकडून प्रथम संधी स्वर्गीय रावसाहेब अंतापुरकर यांना दिले यानंतर याच मतदारसंघात दुसऱ्यांदा माजी आमदार सुभाष साबणे यांना आमदार म्हणून संधी देण्यात आली होती तर तिसऱ्यांदा परत स्वर्गीय रावसाहेब अंतापुरकर यांना उमेदवारी देऊन त्यांना भरघोस मतांनी निवडून आणण्यात आले परंतु कोरोनाच्या काळात विद्यमान आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे दुःखद निधन झाले तेव्हा घेण्यात आलेल्या पोट निवडणुकीत देखील स्वर्गीय रावसाहेब अंतापुरकर यांचे चिरंजीव जितेश रावसाहेब अंतापुरकर यांनाच मतदारसंघात आमदार म्हणून निवडून देण्यात आले.
राखीव असलेल्या या विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या चवथ्या निवडणूकीत बौद्धांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी मोठ्या प्रमाणात बौद्ध समाजातील इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्याकडून करण्यात आली असता त्यांनी केलेल्या मागणीनुसार राखीव असलेल्या देगलुर बिलोली या मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडून मतदारसंघातील निवृत्ती दादा कांबळे सांगविकर यांना माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या नेतृत्वाखाली उमेदवारी देण्यात आली आहे तर वंचित बहुजन आघाडी कडून देखील बौद्ध समाजाचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आला आहे.
या मतदारसंघात स्वर्गीय रावसाहेब अंतापुरकर आणि त्यांचे चिरंजीव जितेश अंतापुरकर व सुभाष साबने साहेब यांना आमदार म्हणून या मतदारसंघात संधी देण्यात आली होती अजूनही ही संधी पुन्हा आपल्यालाच मिळावी यासाठी काँग्रेस मधून भाजपात गेलेले जितेश अंतापुरकर निवडणूक रिंगणात आहेत तर शिवसेना सोडून जनस्वराज्य पक्षात गेलेले माजी आमदार सुभाष साबने हे पुन्हा निवडणूक लढवण्यासाठी सज्ज असल्याने या मतदारसंघात आजपर्यंत माजी खासदार भास्कररावजी पाटील खतगावकर हे ठरवतील तोच आमदार झालेला आहे.
यामुळे या होत असलेल्या निवडणूकित वंचित बहुजन आघाडी कडून बौद्धाचाच उमेदवार आणि काँग्रेस पक्षाकडून देखील बौद्धांचा उमेदवार दिल्याने या निवडणुकीच्या धुमाळीत बौद्धांची मते मात्र निर्णायक ठरतील असे चित्र दिसून येत आहे.