महिलांच्या सबलीकरणासाठी काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करा – डॉ.मिनल खतगावकर

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : काँग्रेसने महिलांच्या सक्षमीकरणासाठी नेहमीच प्रयत्न केला असून आजपर्यंत महिलांनी आपली ताकत काँग्रेसच्या पाठीशी उभी केली आहे. महिलांचे मतदान हे काँग्रेससाठी नेहमीच एक शकती राहीलेली आहे त्यामुळे राज्यातील महिलांच्या सबलीकरणासाठी काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करा असे आवाहन महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ.मिनल खतगावकर यांनी केले आहे.

नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व नायगाव विधानसभा निवडणुकीसाठी नरसी येथे सोमवारी महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला पक्षनिरिक्षक सोमेश्वर रेड्डी, आ. वकाटी श्रीहरी आमदार तेलंगणा, ओबीसी नेते मायी साहेब, श्रीनिवास चव्हाण, भास्कर भिलवंडे, सय्यद ईसाक, दिलीप कांडाळकर, अँइ.रानवळकर, सिमाताई देशमुख नांदेड, महानंदा गायकवाड, रेखाताई बनसोडे, चंद्रकांत देवारे संभाजी रानवळकर व आप्पाराव वानोळे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ.मिनल खतगावकर यांनी काँग्रेसची ध्येयधोरणे मांडले काँग्रेस पक्ष नेहमीच तळागाळातील नागरिकांच्या हितासाठी काम करते. या भागातील नेते कै. बळवंतराव चव्इ, कै.वसंतराव चव्हाण भास्कराव पा.खतगावकर यांनी समाजातील गोरगरिबांच्या हितासाठी, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आणि कुटूंबाच्या कल्याणासाठीची भुमिका घेवून काम केले आहे. प्रत्येक जाती धर्माच्या मानसांना न्याय देता आला पाहिजे, सर्वांना सोबत घेवून चालण्याचा प्रयत्न केल्यास विकास साधता येतो अशी भुमिका काँग्रेसची होती आणि राहणार आहे.
देशाच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांना पंतप्रधान पदापर्यंत पोहचण्यासाठी महिलांनी आपली ताकत त्यांच्या पाठीशी उभी केली होती. त्यामुळे महिलांचे मतदान काँग्रेसला बळ देणारे ठरले आहे. महिलांनी यावेळीही आपली ताकद काँग्रेसच्या पाठीशी उभी केल्यास नांदडचा खासदार व नायगावचा आमदार निवडणूक येणार आहे.
राज्यात काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार आल्यास महिलांच्या सबलीकरणाची चळवळ राबवली जाईल, महिलांचे प्रश्न सुटतील त्यामुळे महिलांनी आपली आपली शक्ती काँग्रेसच्या पाठीशी उभी करावे असे आवाहन करुन डॉ. मिनल खतगावकर यांनी या भागातील आमदारांनी शेतकऱ्यासाठी, महिलासा सक्षमीकरणासाठी आणि बेरोजगार तरुणांना रोजगार देण्यासाठी कुठलेच काम केले नाही अवी बोचरी टिका आ.राजेश पवार यांच्यावर केली.
काँग्रेसला या सर्व अडचणीच्या प्रश्नावर काम करायचे आहे. नौकरी लागेपर्यंत तरुणांना दर महिण्याला चार हजार आमचे सरकार देखील महिलांसाठी महालक्ष्मी योजना राबवणार असून या योजनेंतर्गत महिण्याला ३ हजार देणार आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. नरसी येथे आयोजित करण्यात आलेल्या महिला मेळाव्याला नायगाव तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या