चिरली – टाकळी गावात जलजीवन मिशनचे काम अपूर्ण ◆ कामाची चौकशी करा…
अन्यथा आमरण उपोषण करण्याचा साहेबराव कांबळे यांचा इशारा ◆जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले

कुंडलवाडी :- येथून जवळच असलेल्या चिरली- टाकळी गावातील जलजीवन मिशनचे काम अपुर्ण असल्याने गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.जलजीवन मिशनचे काम अपुर्ण ठेवून या कामाचा खर्चाची उचल करण्यात आली आहे. गत वर्षभरापासून काम अपुर्ण ठेवणा-या कंत्राटदार व शासकीय अधिकाऱ्यावर कारवाई करावी अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा चिरली-टाकळी येथील नागरिक तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक साहेबराव कांबळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
चिरली- टाकळी येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या कामास २९ सप्टेंबर २०२१ रोजी मान्यता मिळाली. १६ फेब्रुवारी २०२२ रोजी कामाचे कार्यारंभ आदेश देण्यात आले. सदरील काम हे १ कोटी ५२ लाख ७ हजार रुपयांचे आहे.
जलजीवन मिशन कामांतर्गत असलेल्या विहीर गावातील पाईपलाईन व नळ जोडणी चे कनेक्शन ची कामे अद्यखप प्रलंबित आहेत. काम पूर्ण झाले नसतानाही कामाच्या खर्चाची उचल करण्यात आली आहे.
जलजीवन मिशनचे कामा पूर्ण राहिल्याने चिरली व टाकळी येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.पाणी उशाला आणि कोरड घशाला अशी म्हणण्याची वेळ चिरली- टाकळी येथील नागरिकांवर आली आहे. जल जीवन मिशनचे कामे अपूर्ण ठेवणाऱ्या कंत्राटदार व शासकीय अधिकाऱ्यावर कारवाई करावी.
तसेच सदरील जलजीवन कामाची चौकशी करण्यात यावी अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा चिरली- टाकळी येथील नागरिक तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक साहेबराव कांबळे यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.