कुंडलवाडी सोसायटीच्या जलसिंचन योजनेचे कर्ज माफीच्या निधी वितरणाचा शासन निर्णय जारी
◆शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार ◆चेअरमन सुनील बेजगमवार यांच्या प्रयत्नांना यश

कुंडलवाडी :- येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या जलसिंचन योजनेची कर्जमाफी विविध अटीवर करण्यात आल्याचा शासन निर्णय दि.१८ जून २०२४ रोजी जारी करण्यात आला होता. या शासन निर्णयामध्ये जलसिंचन योजनेसाठी घेतलेले शासनाकडून घेतलेले दोन कोटी पाच लाख रुपयाचे मुद्दल शासन माफ करणार होते.
या कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सदरील कर्जावरील संपूर्ण व्याज माफ करण्याची अट ठेवण्यात आली होती. त्यानुसार जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाने पुणे येथील सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था यांना तसा ठराव सादर केला होता.
यानंतर आज दि.२८ फेब्रुवारी २०२५ रोजी शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने २ कोटी ५ लाख कर्जमाफीच्या निधी वितरीत करण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला असून लवकरच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे. खासदार अशोक चव्हाण व आमदार जितेश अंतापुरकर यांच्या माध्यमातून चेअरमन सुनील बेजगमवार यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे.
कुंडलवाडी सोसायटीच्या माध्यमातून १९८५ साली सभासदांच्या शेतजमिनीच्या सिंचनासाठी कुंडलवाडी, शेळगाव, चन्नापुर व पाटोदा, माष्टी या गावातील शेतकऱ्यांसाठी दोन उपसा जलसिंचन योजनेचे काम सुरू केले. यासाठी कुंडलवाडी, शेळगाव, चन्नापूर या योजनेसाठी १ कोटी ९ लाख २५ हजार ७७५ व पाटोदा, माष्टी या योजनेसाठी ९६ लाख २ हजार असे एकुण २ कोटी ५ लाख २७ हजार ८६८ रुपयांचे कर्ज जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर बोजा टाकून घेतले होते. सोसायटीने दोन्ही योजनेचे काम सुरू करून १९९४ साली पूर्ण केले. परंतु गोदावरी नदीमध्ये पाणी उपलब्ध नसल्याने सदर योजना कार्यान्वित होऊ शकली नाही.
त्यामुळे सातबारा उताऱ्यावर कर्जाची नोंद असलेल्या शेतकऱ्यांना सिंचनाचा कणभरही फायदा झाला नसून मुद्दलावर जवळपास सहा ते सात पट व्याज झाले. सदरच्या योजनेतील शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर कर्जाच्या बोजाची नोंद असल्यामुळे त्यांच्या शेतजमिनीची खरेदी विक्री करणे ही यामुळे अशक्य झाले आहे. योजनेतील ९० टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत योजनेतील ५६९ शेतकरी सभासद आहेत.
वर्षभरापूर्वी झालेल्या सोसायटी निवडणुकीत गोदावरी शेतकरी विकास पॅनलचा विजय झाला. त्यावेळेस जाहीरनाम्यात जलसिंचन योजनेचे कर्ज माफ करण्याचे नमूद केले होते. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता पूर्वी अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर सोसायटीचे संचालक चेअरमन सुनील बेजगमवार, व्हाईस चेअरमन गंगाधर नरावाड व संचालकांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
अशोक चव्हाण यांच्या प्रवेशानंतर मात्र भाजपच्या सरकारकडून सोसायटीचे जलसिंचन योजनेचे कर्ज विविध अटी ठेवून माफ करण्यात आले. शासन निर्णयानुसार या कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्जावरील संपूर्ण व्याज माफ करण्याबाबत सर्वसाधारण सभेच्या ठरावासह सहकार आयुक्त पुणे यांना प्रस्ताव सादर करणे आवश्यक राहणार आहे.
तसेच बँकेकडून सदरचा प्रस्ताव शासनास प्राप्त झाल्यानंतर शासकीय अर्थ सहाय्य बँकेत वितरित करण्यात येणार असून शासनाकडून सदर रक्कम बँकांना उपलब्ध करून दिल्यानंतर संबंधित संस्थांच्या कर्ज खात्यावर वर्ग करून सभासद शेतकऱ्यांच्या नावावरील कर्ज बेबाक करण्याची तसेच कर्जदार शेतकऱ्यांना सातबारा कोरा करण्याची कारवाई संबंधित बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी करावी असे शासन आदेशात नमुद केले.तसेच सदर कर्जमाफीच्या निधी वितरणाबाबतचा स्वतंत्र आदेश नमुद केले होते.
त्यानुसार जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाने पुणे येथील सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था यांना तसा ठराव सादर केला होता. यानंतर आज दि.२८ फेब्रुवारी २०२५ रोजी शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने २ कोटी ५ लाख कर्जमाफीच्या निधी वितरीत करण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला असून लवकरच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे.
कुंडलवाडी सेवा सोसायटी च्या उपसा जलसिंचन योजनेच्या थकीत कर्जातुन मुक्ती देण्याचा निर्णय दि.१६ मार्च २०२४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत माजी मुख्यमंत्री खा.अशोकरावजी चव्हाण साहेब, आ.जितेश अंतापुरकर यांच्या अथक प्रयत्नामुळे मुळे झाला होता.
यात शासन निर्णयात नुसार जिल्हा मध्यवर्ती बँकेने कर्जावरील संपूर्ण व्याज माफ करणे बाबत सहकार आयुक्त पुणे यांना प्रस्ताव सादर करावा. त्यानुसार सर्व अटी व शर्तीचे पालन झाल्यानंतर शासनातर्फे आज २८ फेब्रुवारी २०२५ रोजी दोन कोटी पाच लाख रुपये निधी वितरणाचा शासन निर्णय ज्या जारी झाला आहे. सर्वांनी यासाठी मागील संचालक मंडळ यांच्या पासून सुरू झालेल्या प्रयत्नांना आणि नंतर माझ्या कार्यकाळात पदभार घेतल्यापासून सातत्यपूर्ण आणि प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करून, तांत्रिक बाबीची पूर्तता करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.
कर्ज माफीचा हा क्षण ३९ वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडानंतर आनंद द्विगुणित करणारा ठरला आणि म्हणून हा क्षण सुवर्ण अक्षरात लिहिन्यासारखा आहे, असा निर्णय झाल्यामुळे सर्वांना आनंद होत आहे. लवकरच खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना सातबारा कोरा झाल्याचे बेबाकी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात येणार आहे.
सुनील बेजगामवार
चेअरमन, वि.का.से.सो. कुंडलवाडी.