मयत शेतकऱ्यांच्या वारसांना मिळाला तीन वर्षांनी न्याय ; उपजिल्हाधिकारी स्वाती दाभाडे यांच्या प्रयत्नांना यश…
सामाजिक कार्यकर्ते नागनाथ माळगे यांनी केला होता पाठ पुरावा

सौ.मीना राजू भद्रे
धर्माबाद :- धर्माबाद तालुक्यांतील सुमारे १७४ मयत शेतकऱ्यांच्या वारसांना कर्ज माफी योजनेचा लाभ मिळत नव्हता आणि नव्याने पीक कर्ज देखील मिळत नव्हते. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते नागनाथ माळगे यांनी दोन वेळा उपोषण केले होते तरी देखील सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी यात लक्ष घातले नव्हते शेतकरी संघर्ष विकास समितीच्या वतीने उपजिल्हाधिकारी स्वाती दाभाडे यांच्याकडे या संदर्भात निवेदन देण्यात आले त्यांनतर त्यांनी तातडीने कडक धोरण अवलंबविले आणि दीर्घकाळ पासून प्रलंबित असलेला विषय मार्गी लागला आहे.

महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेतील लाभार्थ्यांना त्याच वेळी तात्काळ लाभ मिळणे आवश्यक होते पण मयत शेतकऱ्यांच्या वारसांचे आधार प्रमानिकरन नसल्याचे कारण पुढे करून बँक व्यस्थापणाने हा विषय प्रलंबित ठेवला यात सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी मात्र जाणीवपूर्वक चालढकल केली त्यामुळे मयत शेतकऱ्यांच्या वारसांना नव्याने पिक कर्ज देखील मिळत नव्हते. सामजिक कार्यकर्ते नागनाथ माळगे यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा कायम ठेवला व या संदर्भात शेतकरी संघर्ष समिती मार्फत उपजिल्हाधिकारी स्वाती दाभाडे यांच्याकडे निवेदन देण्यात आले.
त्यांनतर मात्र सूत्रे गतिमान फिरली आणि तीन वर्षा पासून प्रलंबित असलेला विषय मार्गी लागला आहे. मयत
शेतकऱ्यांच्या वारसांना नव्याने पिक कर्ज देण्यात आणि कर्जमाफी योजनेतील लाभ मिळवून देण्यासाठी सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांचे अपयश यात दिसून आले आहे.