जल जीवन मिशनची कामे दर्जेदार करून घेण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा – आमदार प्रताप पाटील चिखलीकर

बालासाहेब शिंदे
मारतळा :- जल जीवन मिशनची कामे दर्जेदार करून घेण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन आमदार प्रताप पाटील चिखलीकर यानी केले. एक दिवस गावकऱ्यांसोबत या उपक्रमा अंतर्गत ग्राम दरबार या कार्यक्रमाचे आयोजन दि.२५ रोजी मारतळा ता. लोहा येथे करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले की जल जीवन मिशन योजनेचे काम एकदा झाल्यावर किमान वीस पंचवीस वर्ष तरी पाणी पुरवठ्याचे काम त्या गावात होणार नाही.

त्यामुळे आताच त्या कामावर ग्रामस्थांनी लक्ष देऊन ती काम दर्जेदार पद्धतीचे करून घ्यावे कोणत्याही गावात निकृष्ट काम होत असल्यास विरोधक असो की सत्ताधारी यांनी माझ्याकडे ताडतोब तक्रार द्या संबंधित अधिकारी आणि गुतेदारावर कारवाई केली जाईल या कामात हलगर्जी करणाऱ्याची गय केली जाणार नाही असे म्हणाले.

यावेळी व्यासपीठावर तहसिलदार विठ्ठल परळीकर, बीडीओ डी के आडेराघो, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, मोहनअण्णा हंबर्डे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप धर्माधिकारी, माजी सभापती प्रवीण चिखलीकर, बालाजी मारताळेकर, आनंद ढाकणीकर, गणेश सावळे, सुभाष गायकवाड, गणेश उबाळे, बाळू पाटील, कन्हैया कदम, शंकर ढगे, बालाजी शिंदे, डी.एल देशपांडे, चंद्रशेखर सहारे, बळी पाटील, काशिनाथ पाटील आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा पुष्पहार घालून आयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना बीडीओ आडेराघो यांनी कार्यक्रम आयोजित करण्यामागचा उद्देश सांगून उपक्रमाबद्दल माहिती दिली.
त्यानंतर उमरा व वाडेपुरी जिप सर्कल मधील उपस्थीत नागरिकांनी आपल्या समस्या आमदार चिखलीकर यांच्या पुढे मांडल्या त्यानंतर प्रशासनाच्या वतीने त्याबाबत उत्तरे देण्यात आली यामध्ये बहुतांशी समस्या ह्या पांदण रस्ते, महावितरण, पाणी पुरवठा, घरकुल आदी बाबत होत्या.
वडेपुरी येथील आरोग्य केंद्रातील कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याची तक्रार येथील ग्रामस्थांनी केली त्यावेळी उपस्थित असलेले आरोग्य अधिकारी यांना आमदार चिखलीकर यांनी उत्तर विचारले असता त्यांना नोटीस देऊन पगार बंद करण्यात आली असल्याचे माहिती त्यांनी दिली यांविषयी बोलताना चिखलीकर म्हणाले की ज्यांना या तालुक्यात नोकरी करायची आहे त्यांनी मुख्यालयी राहिले पाहिजे.
अन्यथा हा तालुका सोडून दुसऱ्या तालुक्यात जा माझ्याकडून एकदा कारवाई झाल्यास पुन्हा ती कारवाई मी मागे घेणार त्यामुळे ती वेळ माझ्यावर येऊ देऊ नका असे म्हणत येथील कर्मचारी यांना निलंबित करावे असे आदेश तालुका आरोग्य अधिकारी यांना त्यांनी दिले. यावेळी लोहा तालुका अंतर्गत विविध विभागाचे विभागप्रमुख, कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.