89 नायगाव विधानसभाताज्या बातम्यानांदेड

आ.राजेश पवार यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर : ज्यांना छळले, त्रास दिला, गुन्हे दाखल केले ते सर्वच उट्टे काढण्यासाठी आतूर

प्रकाश महिपाळे

नायगाव : मागच्या पाच वर्षात हम करे सो कायदा या प्रमाणे वागणाऱ्या आ.राजेश पवार व त्यांच्या पत्नीच्या विरोधात सारेच एकवटले आहेत. पक्ष सोबत असला तरी पाच वर्षात ज्यांना ज्यांना छळले, गुन्हे नोंद केले, खालच्या पातळीवर जावून टिका केली, जाणीवपूर्वक डावलले, अनेक सरपंचाच्या तक्रारी केल्या यासह पदाधिकाऱ्यांना कधीच विचारले नाहीत असे सर्वजन उट्टे काढण्यासाठी आतूर झाले आहेत. त्यामुळे मतदार संघात भाजपचा एकही प्रमुख पदाधिकारी प्रचारात नाही. परिणामी आ.पवार यांना आव्हानांचा सामना करावा लागत आहे.

मोदी लाटेत राजेश पवार हे 2019 मध्ये आमदार झाले. तेव्हापासून ते कुणाचेच ऐकत नाही आणि त्यांच्या हेकेखोर स्वभावामुळे त्यांना कुणी सांगण्याचाही प्रयत्न करत नाहीत. आमदार झाल्यानंतर पदाधिकारी आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेवून काम करतील असे वाटत असताना ते स्वतः व पत्नी एवढेच त्यांचे कार्यक्षेत्र सिमित झाले. कुठल्याच कार्यक्रमाला मतदार संघातील प्रमुख कार्यकर्त्यांना व्यासपीठावर तर सोडाच बँनरवर सुध्दा संधी नसते. केवळ ते स्वतः व पत्नी पुनम पवार यांचाच फोटो व व्यासपीठावरही तेच.

लोकप्रतिनिधी झाल्यावर विरोधात टिका टिप्पणी करणारच पण टिका करणाऱ्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल करणे, कामासाठी फोन करणाऱ्या कार्यकर्त्यांना शिविगाळ करणे असे प्रकार अनेक वेळा घडले आहेत. गावागावात विकास कामासाठी निधी देण्याअगोदरच नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी सरपंच आणि ग्रामसेवकावर दबाव टाकणे, एखाद्या सरपंचाने किंवा ग्रामसेवकाने न दिल्यास त्यांची जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे खोट्या तक्रारी करणे आणि त्यांना बडतर्फ करणे असे प्रकार केल्याने सरपंचही प्रचंड नाराज आहेत.

मागच्या पाच वर्षात नायगाव विधानसभा मतदार संघातील एकाही जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्याला व पदाधिकाऱ्यांना विश्वासत किंवा सोबत घेवून काम केले नाही. भाजप पदाधिकाऱ्यांनी आणलेल्या कामाचे सुध्दा श्रेय घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. कोणत्याही विकास कामाचा शुभारंभ सोहळा असो कि लोकार्पण फक्त स्वतः व पत्नी एवढेच असत.

वास्तविक नियमानुसार शासकीय कामाच्या फलकावर पत्नीचे नाव टाकता येत नाही पण अधिकाऱ्यावर दबाव अणून पत्नीचे नाव टाकण्याची हौस भागवून घेत आहेत. रस्ते व नाली यासह विकास कामासाठी शेकडो कोटीचे कामे केल्याचा दावा करतात पण केलेले रस्ते सहा महिणेही टिकत नसल्याने रस्त्याच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

मागच्या पाच वर्षात हम करे सो कायदा या प्रमाणे मनमानी वागले असल्याने व सध्या निवडणुकीचा प्रचार करत असताना त्यांच्यासोबत एकही जुना किंवा निष्ठावंत भाजपाई दिसून येत नाही. केवळ स्वार्थासाठी सोर समोर करणारे काही तथाकथित कार्यकर्तेच दिसून येत आहेत. गेल्या पाच वर्षात कधीच न विचारणारे आमदार निवडणुकीच्या तोंडावर दुरावलेल्या पदाधिकाऱ्यांना फोन करुन झाले गेले विसरून जा पुन्हा सोबत काम करुयात अशी विनंती केली पण यातील एकही पदाधिकारी सोबत आला नाही.

भाजप पदाधिकारी आणि निष्ठावंत कार्यकर्ते दुसरच असल्याने मतदार संघात आ.राजेश पवार यांच्या विरोधात वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे मागील पाच वर्षात ज्यांना ज्यांना आ. पवार यांच्यामुळे अडचणीला सामोरे जावे लागले पोलीस ठाण्याची हवा खावी लागली ते सर्व एकत्र येत असून उट्टे काढण्यासाठी आतूर झाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker