ताज्या बातम्यानांदेडनायगांव

शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी : खा.वसंतराव चव्हाण

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : सध्या पेरणीची तयारी शेतकरी करत आहेत अश्या वेळी काही व्यापारी दुय्यम दर्जाचे बियाणे, खते व औषधी देण्याची शक्यता आहे. त्यामुळे खरीप हंगामासाठी बि-बीयाणे रासायनीक खते, औषधी खरेदी करते वेळी शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याची दक्षता घेण्याची सुचना नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांना केली आहे.

जिल्ह्यात बनावट बियाणे बाजारात दाखल झाले असून काही व्यापारी जाणीवपूर्वक शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. बोगस बियाण्याचा साठा कृषी विभागाने पकडून कारवाई केली आहे. त्यामुळे २०२४ च्या खरिप हंगामाला सुरुवात झाली असून काही व्यापारी चढ्या दराने तर काही व्यापारी बनावट बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतात. याची दक्षता घेणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी नांदेड यांना नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांनी एक पत्र लिहीले आहे या पत्रात दक्षता घेण्याच्या सुचना केल्या आहेत.

शेतकरी विविध कृषि सेवा केंद्रातून बि-बीयाणे, रासायनीक खते, औषधी खरेदी केली जातात. अगोदरच शेतकऱ्यांना या किंमती परवडत नसून. त्यामध्ये प्रमाणीत बियाणे, खते, औषधी न मिळाल्यास शेतकऱ्यांचे आर्थीक व वार्षीक उत्पादीत मालाचे नुकसान होऊ शकते. काही प्रमाणात व्यापारी वर्गाकडून दुय्यय दर्जाची खते, बियाणे, औषधी शेतकऱ्यांना देऊन त्यांची फसवणूक होण्याचा शक्यता आहे. हे टाळण्यासाठी कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांना तालूका स्तरावर पूर्ण वेळ कृषी बाजारात कार्यरत ठेऊन शेतकऱ्यांना मदत करणे आवश्यक आहे.

याबाबत संबधीत विभागास सुचीत करून दैनंदीन अहवाल आपल्या कार्यालयाकडे मागवीण्यात आल्यास त्यावर वचक बसेल आणि शेतकरी वर्गाची फसवणूक होणार नाही म्हणून या बाबत प्रशासनामार्फत दक्षता घेणे आवश्यक वाटते असे पत्रात खा.वसंतराव चव्हाण यांनी नमूद केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker