उमरीताज्या बातम्यानांदेड

पक्षाने संधी दिल्यास नायगाव विधानसभेची निवडणूक लढविणार : भाजप नेते मारोतराव कवळे यांची माहिती

प्रल्हाद हिवराळे

उमरी : माझ्याकडे कुठलेही पद नसतात नायगाव मतदारसंघात उद्योग उभारुन बेरोजगार तरुण व शेतकऱ्यांच्या हाताला काम मिळवून देण्याचा आजपर्यंत यशस्वी प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर मतदारसंघातील सिंचनाचे प्रश्नही भविष्यात सोडवायचे आहेत त्यामुळे मी भाजपकडे नायगाव मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारीची मागणी करणार असल्याची माहिती व्हीपीके उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष मारोतराव कवळे यांनी पञकारांशी संवाद साधताना दिली.

शेतकरी नेते मारोतराव कवळे यांनी शनिवारी उमरी येथे काही पत्रकारांशी संवाद साधत विधानसभा निवडणूक लढवण्याची त्यांच्या मनातील इच्छा व्यक्त केली. शेतकरी, शेतमजूर, सुशिक्षित बेरोजगार, व्यापारी यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून मी भागात उद्योग ऊभारले त्यातून आर्थिक बाजू भक्कम झाल्याने शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार युवक व व्यापारी हे सन्मानाने जीवन जगत आहेत. त्यातभर म्हणून शेतकरी शेती जोडउद्योग व्यवसाय माध्यमातून दुग्धव्यवसायात जिल्हात धवलक्रांती निर्माण झाली. ऊस पिकातून व दुग्धव्यवसायातून करडो रुपये शेतकऱ्यांच्या खिशात जात आहेत.

मतदारसंघातील शेतकरी सुधारले तरच खरा विकास होय. असे ही मत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, केंद्रीय सहकार मंञी अमितभाई शहा साहेब, मुख्यमंञी एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंञी अजित पवार यांचेही तसे धोरण आहे. त्यांच्या विचारांच्या धोरणानुसार मी पक्षांच्या विचारांचा पताका घेऊन नायगाव विधानसभा मतदार संघात अजून नवनवीन उद्योग उभारून अनेकांना रोजगार उपलब्ध करुन देणार आहे.

देशात व राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार असल्याने शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून त्यांच्या शेतीला बारमाही पाणी कसे मिळवून देता येईल ते ही काम विद्यमान खासदार अशोकराव चव्हाण साहेब व माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोंदी साहेब, देशाचे केंद्रिय सहकारमंञी अमितभाई शहा साहेब, मुख्यमंञी एकनाथराव शिंदे साहेब, उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंञी अजित पवार साहेब यांची भेट घेऊन मतदारसंघातील सिंचनाचे प्रलंबित प्रश्न सोडवेल.

मतदार संघातील शेतकरी शेतमजूर, बेरोजगार तरूण युवक यांची आर्थिक बाजू भक्कम झाली तर यातून व्यापारपेठ वाढेल. शेतक-यांची आर्थिक बाजू भक्कम झाल्याने माझा शेतकरी दोन चाकी वरून चारचाकी वाहन खरेदी करेल, मुलांना चांगले शिक्षण मिळेल, मुलीचे विवाह करतील आणि सन्मानाने जीवन जगता येईल, जर खिशात पैसे नसेल तर वरील प्रश्न सोडवता येणार नाही.

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार मी पक्षाकडे उमेदवारीसाठी प्रयत्न करणार असून मला पक्षाने संधी दिल्यास बीजेपी पक्षातील तिन्ही तालुक्यातील जेष्ठ, कनिष्ठ, तरुण कार्यक्रत्याना सोबत घेऊन जनतेसमोर केलेले मी विकास कामे माडूंन मत माघणार असल्याचे असे व्ही.पी.के.उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष मारोतराव कवळे गुरूजी यांनी पञकांरानी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले.

यापुर्वी माझ्याकडे कुठले पद व सत्ता नसताना शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार युवकांच्या आर्शिवादाने भागात उद्योग उभारले. आता मी भाजप पक्षात असल्याने उमरी, धर्माबाद नायगाव तालुक्यात सिंचनाचे प्रलंबित प्रश्न सोडविन जनतेनी मला विधानसभेच्या निवडणुकीत संधी दिल्यास निवडणूक लढविण्यास तयार आहे असे कवळे गुरूजी यांनी पञकारांशी संवाद साधतांना सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker