ताज्या बातम्याधर्माबादनांदेड

धनशक्ती च्या बळावर राजकारण करणाऱ्यांना जनता कधी माफ करणार नाही – शिवराज पाटील होटाळकर

सौ.मिना राजु भद्रे

धर्माबाद : नायगांव विधानसभा मतदार संघातील जनतेचे आशिर्वाद हीच माझी ताकद असून धनशक्ती च्या बळावर राजकारण करणाऱ्यांना जनता कंटाळली आहे. मी तुमच्या सेवेसाठी कटिबध्द राहील असे प्रतिपादन नायगाव विधानसभा मतदार संघाचे भाजप नेते शिवराज पाटील होटाळकर यांनी धर्माबाद येथील कार्यक्रमात बोलताना केले आहे.

माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसा निमित्त धर्माबाद शहरात आयोजित आरोग्य शिबीर कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रवीण पाटील चिखलीकर होते तर उद्घाटक म्हणून माजी सभापती रामचंद्र पाटील बनाळीकर होते.

व्यासपीठावर श्रावण पाटिल भिलवंडे, बालाजी बचेवार, नारायण पाटील पवार, संजय शेळगावकर, विश्र्वाभर स्वामी यांच्यासह विविध मान्यवर व डॉकटर उपस्थित होते.
शिवराज पाटील यांच्या वतीने हे मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते यास भरभरून प्रतिसाद मिळाला. जाग्यावर नागरिकांची आरोग्य तपासणी करून गोळ्या औषधी देण्यात आले.

ज्या कुणाला गंभीर आजार असल्यास त्यांनी आमच्याशी संपर्क साधा आम्ही पुढील उपचाराची व्यवस्था करू असे शिवराज पाटील म्हणाले. मी मतदार संघात मागील एक महिन्यापासून जन आशिर्वाद यात्रा सुरू केली त्यास जनता भरभरून शूभेच्छा व आशिर्वाद देत आहे.माझ्या या संपर्क अभियानास भरभरून प्रतिसाद मिळत असल्याने धनशक्ती च्या जोरावर जे राजकारण करत होते त्यांना धक्का बसला आहे.

मी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे पक्षाचे पाठबळ आणि आपले आशीर्वाद पाठीशी आहेत. सर्वसामान्यांची सेवा हेच माझे उद्देश आहे असेही शिवराज पाटील होटाळकर म्हणाले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वांनी परिश्रम घेतले. या शिबिरात शहर व ग्रामीण भागातील नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker