ताज्या बातम्यानांदेडनायगांव

महिलांच्या सुरक्षेबाबत काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन : पिडीत बालिकेप्रती सदभावना केली व्यक्त

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : मागच्या आठ दिवसापासून राज्यातील विविध भागात बलात्काराच्या घटना घडत असल्याने वातावरण चांगलेच तापले असताना बदलापूरच्या घटनेनंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली आणि संतापाचा उद्रेक झाला होता. त्यामुळे शनिवारी महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता. परंतु न्यायालयाने बंदला नकार दिल्यामुळे याबाबत तहसीलदारांना निवेदन देवून पिडीत बालिके प्रती सदभावना व्यक्त करण्यात आली.

युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माणिक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले असून. दिलेल्या निवेदनात मागच्या आठ दिवसात घडलेल्या काही घटनांमुळे महिलांच्या सुरक्षिततेबद्दल गंभीर चिंता व्यक्त केल्या आहेत. आहेत. महिलांची सुरक्षितता समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यावश्यक आहे. परंतु अलीकडील काळात महिलांवर होणारे लैंगिक अत्याचार, छेडछाड आणि इतर हिंसक घटनांमुळे महिलांमध्ये भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः विद्यार्थीनी, कामकाज करणाऱ्या महिला आणि गृहिणी या सर्वांमध्ये रात्रीच्या वेळी प्रवास करताना असुरक्षितता जाणवू लागली आहे.

छेडछाड आणि इतर गुन्ह्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या परिसरांमध्ये, विशेषतः रात्रीच्या वेळी, पोलीस गस्त वाढवणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणे, बस स्टॉप, बाजारपेठा आणि रहिवासी भागांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे गरजेचे आहे. यामुळे क्रियाकलापांवर लक्ष ठेवता येईल. आपत्कालीन हेल्पलाइन उपलब्ध आहेत, परंतु अनेक महिलांना त्याबद्दल माहिती नाही किंवा त्यांचा कसा वापर करावा याबद्दल शंका असते. महिलांना उपलब्ध साधनाबद्दल आणि त्यांचा वापर कसा करायचा यावद्दल जागरूक करण्यासाठी जनजागृती मोहीम राबविणे, महिलांसाठी स्वसंरक्षण कार्यशाळा आयोजित करणे त्यांना स्वतःचे रक्षण करण्यासाठी सक्षम बनवेल असा प्रयत्न आवश्यक आहे, महिलांकडून येणाऱ्या तातडीच्या फोन कॉल्सना त्वरित प्रतिसाद देणारे त्वरित प्रतिसाद संघ स्थापन करणे आवश्यक आहे. असे मुद्दे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहेत.

बदलापूर घटनेनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले होते आणि महिलांची सुरक्षितताही ऐरणीवर आल्यावर महाविकास आघाडीच्या वतीने (ता.२४) रोजी महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता मात्र न्यायालयाने बंद अवैध ठरवला त्यामुळे तालुक्यातील काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले यावेळी संजय चव्हाण, नगरसेवक शरद भालेराव, विठ्ठल बेळगे, नारायण जाधव, साईनाथ चन्नावार, अजिंक्य कल्याण, शाम शिंदे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker