कै.खा.वसंतराव चव्हाण अनंतात विलीन : शासकीय इतमामात करण्यात आले अंत्यसंस्कार

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : काँग्रेसचे खा. वसंतराव चव्हाण यांच्या पार्थिवावर दि.२७ रोजी सकाळी ११.३० वाजताच्या दरम्यान नायगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले . आपल्या आवडत्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी राजकीय, सामाजिक साहित्यिक क्षेत्रासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि जिल्हाभरातील हजारो चाहत्यांचा जनसमुदाय उपस्थित होता.

हैद्राबाद येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असतांना खा. वसंतराव चव्हाण यांची सोमवारी दि.२६ रोजी पहाटे प्राणज्योत मालवली. सोमवारी दुपारी त्यांचे पार्थिव नायगाव येथे आणले त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी रात्री उशिरापर्यंत राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते साहित्य क्षेत्रातील व्यक्तींनी गर्दी केली होती. मंगळवारी दि.२७ रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आपल्या लाडक्या नेत्याला शेवटच्या क्षणापर्यंत पाहण्यासाठी चाहत्यांनी लाखोच्या जण समुदायने गर्दी केली होती.

नायगाव तालुक्यातील प्रत्येक गावागावातून जनसमुदाय मोठ्या प्रमाणात नायगाव शहरात हजर झाला होता. प्रत्येक गावातून बँड घेऊन मुराळ आपल्या नेत्याला निरोप देण्यासाठी आले होते. बाहेर गावाहून आलेल्या लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून कार्यकर्यांनी जागोजागी चहाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती.

अंत्यसंस्कारासाठी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, पालकमंत्री गिरीश महाजन, काॅग्रेस नेते बाळासाहेब थोरात , माणिकराव ठाकरे, यदुबन गुरूगंभीरबन महाराज कोलंबीकर, विरोधी पक्षनेते आ.विजय वडेट्टीवार, खा.शिवाजीराव काळगे, खा. रजणीताई पाटील, खा. बंडू जाधव, खा.अजित गोपछडे, आ.अमित देशमुख, आ.धिरज देशमुख, आ.सौ. मेघना बोर्डीकर, आ.राजेश पवार, आ.मोहनराव हबर्डे.

आ.तुषार राठोड, आ.शामसुंदर शिंदे, आ.रितेश आतंपुरकर, आ.विक्रम काळे, माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी मंत्री भास्करराव पा.खतगावकर, माजी खासदार हेमंत पाटील, माजी मंत्री माधवराव किन्हाळकर, माजी मंत्री कमलकिशोर कदम, माजी आ. अमर राजुरकर, सुमाजी आ. सुभाष साबणे, माजी आ.गंगाधर पटणे, आ.बालाजी कल्याणकर, माजी मंत्री सुर्यकांता पाटील, माजी मंत्री डि.पी.सावंत, माजी खा.सुभाष वानखेडे.

छावाचे नानासाहेब जावळे, प्रा.मनोहर धोंडे, माजी आ.ओमप्रकाश पोकर्णा, माजी आ. हानंमतराव पा.बेटमोगरेकर, बाळासाहेब रावणगावकर, प्रणिताई चिखलीकर, बी.आर.कदम, हरिहराव भोसीकर, भगवानराव आलेगावकर, शाम दरक, यशपाल भिंगे, अविनाश भोसीकर, सुरेश दादा गायकवाड, किशोर स्वामी, मंगाराणी आबुलगेकर, एकनाथ पवार, भगवानराव देशमुख, सुनील कदम,तानाजी पवार, श्रावण पा.भिलवंडे.

बालाजी बच्चेवार, शिवराज पा.होटाळकर, बालाजी पांडागळे, विनय गिरडे, दिलीप पा.बेटमोगरेकर, संजय पा.शेळगावकर, माजी सभापती संजय अप्पा बेळगे, संभाजी पा.भिलवंडे, रविंद्र पाटील.भिलव॔डे, भुजंग पाटील, देविदास राठोड, संजय क-हाळे ,भास्कर पा.भिलवंडे, आशाताई शिंदे, दिलीप कंदकुर्ते, अब्दुल सत्तार, प्रविण साले, पप्पू कोंडेकर, बालाजी गाढे यांच्यासह जिल्हाभरातील हजारो चाहते, उपस्थित होते.

यावेळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस विभागाच्या वतीने हवेत तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. शासनाच्या वतीने पालकमंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप, व जिल्हा पोलीस अधिक्षक अबितकुमार यांनी पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहीली.
यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणावाल, अप्पर जिल्हाधिकारी बोरगावकर, अप्पर पोलीस अधीक्षक एस. पी. गुरव, भोरकरचे उपविभागीय अधिकारी प्रविण मेगशेट्टी, धर्माबादच्या उपविभागीय अधिकारी स्वाती दाभाडे, बिलोलीच्या उपविभागीय अधिकारी क्रांती डोम्बे, तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड, नायब तहसीलदार विजय यरावाड, संजय देवराये जिल्ह्यातील अनेक आधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
वसंतराव चव्हाण हे आमच्या सर्वाचे परममित्र होते.ते आमच्या सोबत राजकारणात बरीच वर्ष झाले चांगले व एकनिष्ठ काम केले यांचा आम्हाला अभिमान आहे.ते या परिसरात जनतेचे कैवारी होते.त्यांची काम करण्याची पध्दत फार चांगली होती ते आपल्यातून एवढ्या लवकर निघून जातील असे कधी वाटले नाही त्यांच्या निधनाने मी एक चांगला मित्र गमावला आहे. – बाळासाहेब थोरात