ताज्या बातम्याधर्माबादनांदेड

रजिस्टरी ऑफिस वादग्रस्त गटांच्या रजिस्टऱ्या कोणत्या आधारे करत आहे ; जिल्हाधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज जनतेची मागणी…

सौ.मीना भद्रे
धर्माबाद :- धर्माबाद हे शहर एक व्यापारी पेठ म्हणून प्रसिद्ध आहे पण या शहरात काही बोगसगिरी करणाऱ्या लोकांची टीमने अनेक दिवसापासून कार्यरत झाली असून अनेक वाद असेलल्या जमिनी रजिस्टरी ऑफिस ला हाताशी धरून करून घेतल्या गेले त्यामुळे भू माफिया व अधिकारी यांची काही मिली भगत तरी नाही का असा प्रश्न जनतेला पडला आहे.

नगर पालिकेत काही दिवसापूर्वीच बोगस गावठाण प्रमाणपत्र देऊन रजिस्टरी केल्याचा प्रकार उघडकीस आला यात काही पाच सहा कर्मचाऱ्यांवर गुन्हे पण दाखल करण्यात आले तरी पण अनेक वाद असलेल्या क्षेत्राचे प्रकरण अगदी सोईस्कर पने नियमात बसवून रजिस्टरी केली जात असल्याने भविष्यात आणखी काही घोटाळा घडला तर त्याला जबाबदार कोण?
रजिस्ट्री करण्यापूर्वी सदरच्या दस्तची चौकशी करून ती नियमात आहेत का हे पाहण्याची जबाबदारी त्या विभागाची असते पण इथे नियम बाजूला का सोडत आहेत हे मात्र एक कोडे बनले आहे.

शासनाचे वेळापत्रक जाहीर आहे तरी देखील रात्री सात ते आठ वाजे पर्यंत देखील काही रजिस्ट री करण्यात आले त्यामुळे यात दोष कोणाचं तसेच सरळ आणि नियमात बसणारे दस्त नोंदणी असतील तर शासनाची वेळ संपल्या वर का केल्या जात आहे याची चौकशी करून येणाऱ्या काळात तरी जमिनीचे घोटाळे होऊ नयेत यासाठी कलेक्टर साहेबांनी लक्ष घालणे गरजेचे बनले आहे.

मागच्या काळात जे बोगस रजिस्टरी झालेली आहेत ती प्रकरण न्यायालयात चालू आहे येणाऱ्या काळात तरी असे प्रकार घडू नयेत यासाठी कलेक्टर साहेबांनी वेळीच लक्ष घालून मागील वर्षभरात सायंकाळची शासनाची वेळ संपल्या नंतर जे दस्त नोंदणी केले त्याची तपासणी करून भू माफिया व त्यांच्या शी मिलीभगत असणाऱ्या कायदेशीर कारवाई करून कायद्याचा धाक दाखवून देणे गरजेचे बनले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker