ताज्या बातम्यानांदेडनायगांव

बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांची लुट : कृषी विभागाची बघ्याची भुमिका

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : मागच्या महिण्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे व सर्वेक्षण पिक विमा कंपणी कुणालाही विश्वासात न घेता तर करतच आहे पण शेतकऱ्याकडून मोठ्या प्रमाणात अर्थिक लुट करत असताना अर्थिक ओझ्याखाली दबलेल्या कृषी विभागाचे अधिकारी बघ्याची भुमिका घेत आहेत. दुसरीकडे कृषी सहायकाविना करण्यात आलेला पंचनामा ग्रहीत धरल्या जाणार नसल्याचे सांगत आहेत. त्यामुळे कृषी विभागाच्या या दुहेरी भुमिकेमुळे तालुक्यात सावळा गोंधळ वाढला आहे.

मागच्या महीण्याच्या सुरुवातीलाच नायगाव तालुक्यात पावसाने धुंवाधार बँटींग केल्यामुळे खरिपांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना तातडीने अर्थिक मदत करण्याचे धोरण ठरवण्यात आले. त्यासाठी कृषी सहायक, ग्रामसेवक, तलाठी व पिक विमा कंपनीचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत संयुक्त पंचनामे करण्याचे ठरले होते.

पण पिक विमा कंपणीचे प्रतिनिधी कुणालाही विश्वासात न घेता किंवा ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहायकाच्या परस्परच पंचनामे करण्यासाठी गावोगावी जात आहेत. संबधीत कंपणीचा एक तालुका प्रतिनिधी विशिल भद्रे असून त्यांच्या हाताखाली काम करण्यासाठी जवळपास 92 तरुण आहेत.

तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांच्या उपस्थितीत संयुक्त पंचनामे करण्याचे धोरण ठरलेले असताना विशाल भद्रे यांची टिम कुणालाही सुचना न देता गावोगावी जावून पंचनामे व सर्वेक्षण करत आहेत. सर्वेक्षण किंवा पंचनामे करताना प्रत्येक शेतकऱ्याकडून 500 रुपये घेतल्या जात आहेत. शेतकऱ्याकडून होणारी ही लुट तहसीलदार व तालुका कृषी अधिकाऱ्यांना माहीत आहे पण ते या गंभीर प्रकाराकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करत आहेत.

नायगाव तालुका कृषी अधिकारी आणि तहसीलदार यांनी बाधित शेतकऱ्यांचे पंचनामे व सर्वेक्षण करण्यासाठी चालढकल करत असल्याने निवडणुकीची आचारसंहिता लागली तरी पंचनामे पुर्ण झाले नाहीत दुसरीकडे पिक विमा कंपनीचे अधिकारी शेतकऱ्यांची लुट करत आहेत. या लुटीचा प्रकार तालुक्यातील दरेगाव येथे घडला असून या प्रकरणी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रारी झाल्या आहेत पण आजपर्यंत काहीही कारवाई झाली नाही.

विशेष म्हणजे विमा कंपणीचे अधिकारी हे थेट तालुका कृषी अधिकाऱ्यांनाच टार्गेट करत असून कारवाई करण्याची त्यांच्यात काय हिम्मत आहे अशी बेताल वक्तव्ये करत आहेत. हि बेताल वक्तव्य पाहता तालुका कृषी अधिकारी यात गुंतले असल्याची चर्चा होत आहे.

तालुक्यातील दरेगाव येथे घडलेल्या प्रकाराची तक्रार तालुका कृषी अधिकारी नायगाव यांचेकडे दि. 12 आक्टोबर रोजी तेथील शेतकऱ्यांनी दिली आहे. मात्र या प्रकरणी आजपर्यंत काहीही कारवाई करण्यात आली नाही त्यामुळे वेगवेगळे तर्क काढण्यात येत आहेत.

आम्ही संबधीत कंपणीचे तालुका प्रतिनिधी विशाल भद्रे यांना कृषी सहायकाविना करण्यात आलेला पंचनामा ग्राह्य धरल्या जाणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे आणि याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे.
सुनील वरपडे, तालुका कृषी अधिकारी

तालुक्यातील ज्या गावात पंचनामे करण्यासाठी आमची टिम जाणार आहे त्याची तारीख आणि वेळ हि कृषी कार्यालयाला कळवली आहे. त्यामुळे त्याचबरोबर एक दिवस अगोदर संबधीत कृषी सहायकांना फोन केल्या जातो. त्यामुळे त्या त्या दिवशी कृषी सहायक उपस्थित राहणे आवश्यक आहे पण ते राहत नसतील आमची जबाबदारी नाही.
विशाल भद्रे, तालुका प्रतिनिधी पिक विमा कंपनी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker