पल्लवी इंटरप्रायजेसच्या घनचकरा टेंडरचे टेंडर रद्द करुन काळया यादीत टाका – माजी नगरसेवक आडेपवार
शहरात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य ! नाल्या तुडूंब, रस्त्यावरुन जात आहे नालीचे पाणी

New Bharat Times नेटवर्क
मुखेड : मुखेड नगर परिषद येथे घनकचरा व्यवस्थापनसाठी पल्लवी इंटरप्रायजेसला स्वच्छतेचे काम देण्यात आले पण स्वच्छता करण्याऐवजी जागोजागी शहरात कचयाचे ढिग तसेच दिसत आहेत. यामुळे देण्यात आलेले हे टेंडर रद्द करुन टेंडर देण्यात आलेल्या संस्थेस काळया यादीत टाकावे अशी मागणी माजी नगरसेवक प्रा. विनोद आडेपवार यांनी तहसिलदार राजेश जाधव यांच्याकडे दि. 10 मे 2024 रोजी निवेदनाव्दारे मागणी केली.

अस्वच्छतेमुळे शहरातील नागरीकांचे,महिलांचे व लहाण मुलांचे आरोग्य बिघडत आहे. यामुळे साथीचे आजार होऊन रुग्णालये सुध्दा भरगच्च दिसत आहेत. याबाबत वारंवार तोंडी सुचना नपाला देण्यात आल्या पण यावर कोणतीच कार्यवाही होताना दिसत नाही. लाखो रुपयांचे बिल अदा करुनही शहरातील नाल्या तुडुंब भरून वाहत आहे.

शहरातील कचरा डंपींग ग्राऊंडला टाकण्याचे ऐवजी कुठेही रस्त्यावर कचरा टाकुन जात आहेत. यामुळे नागरीक एकदम त्रस्त झाले आहेत. शहर स्वच्छ करण्यासाठी अशा बेजबाबदार संस्थेस टेंडर दिल्याने शहराचा कचरा झाला आहे. अशा बेजबाबदार संस्थेचे टेंडर काढून घेऊन झालेल्या कामाची चौकशी करुन या संस्थेस काळया टाकीत बेजबाबदार वागल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा.
अन्यथा लोकशाही प्रमाणे तहसिल कार्यालयासमोर अमरण उपोषण किंवा धरणे आंदोलन करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी असे माजी नगरसेवक प्रा. विनोद आडेपवार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
पल्लवी इंटरप्रायजेस ला घनचकरा व्यवस्थापनाचे टेंडर देण्यात आले पण हे टेंडर लोकप्रतिनिधीच्या एका जवळच्या माणसाने मी सर्व पाहुन घेतो म्हणुन आपल्या जवळ ठेवले असुन यात दरमहा मोठा आर्थिक व्यवहार होऊन सर्वांनाच वाटा जात असल्याने या टेंडरवर कोणतीच कार्यवाही होताना दिसुन येत नाही अशी दबक्या आवाजात शहरात चर्चा आहे. पण या निवेदनावर मुख्याधिकारी असलेले राजेश जाधव हे काय कार्यवाही करतील याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. तर यावर कोणती भूमिका प्रशासनाच्या वतीने घेण्यात येईल याकडे दैनिक श्रमिक लोकराज्यची नजर सुध्दा असणार आहे.
शहरात घरोघरी जाऊन कचरा विलगीकरुन करुन संकलन करणे व घरोघरी लावलेल्या स्वच्छता अभियान स्टीकरची स्कॅनींग करणे अपेक्षीत असतानाही ही बाब होताना दिसत नाही. स्वच्छ भारत अभियानामध्ये सुध्दा मोठा भ्रष्टाचार झाला असल्याची शक्यता असुन याची सुध्दा सखोल चौकशी करावी अशी मागणी प्रा.आडेपवार यांनी केली आहे.