राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरातील संस्कारातून व्यक्तिमत्व घडते- प्राचार्य डॉ.शिवाजीराव पाटोदे

मोरे मनोहर
किनाळा :- राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष वार्षिक युवक शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यावर चांगले संस्कार केले जात असल्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊन त्यांचे व्यक्तिमत्व घडते असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.शिवाजीराव पाटोदे यांनी केले. ते राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या समारोप समारंभाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथील श्री मधुकरराव बापूराव पाटील खतगावकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे युथ फॉर माय भारत अँड युथ फॉर डिजिटल लिटरसी अंतर्गत मौजे आदमपूर ता. बिलोली येथे निवासी सात दिवशी विशेष वार्षिक युवक शिबिराचे दि.२३ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरातील बौद्धिक क्षेत्रात प्रा.डॉ.आर.डी.शिंदे, प्रा.डॉ.एस.व्ही.धनवडे, प्रा.डॉ.पी.एम. भुमरे, प्रा.भीमराव दिपके, प्रा.सूर्यकांत जिरगे, प्रा.आशा आईलवार, प्रा.डॉ.एच. व्ही.बक्षी, प्रा.एस.बाबाराव, प्रा.डॉ. व्ही.ए.पवळे, प्रा.साईनाथ गायकवाड, प्रा.डॉ.गोजे आर.सी. यांनी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन केले.
या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी गावात स्वच्छता करत गावकऱ्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. बालविवाह विरोधी जनजागृती करण्यासाठी जि.प.आणि म्हाळप्पा पटणे
या शाळेंना भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांना बालविवाह प्रतिबंधक शपथ दिल्यानंतर” आम्हा सर्वांचा एकच नारा बालविवाह मुक्त करू नांदेड जिल्हा सारा” अशा घोषणा देत गावातील प्रमुख रस्त्याने बालविवाह विरोधी जनजागृती रॅली काढण्यात आली. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी रात्रीला विद्यार्थी आणि गावकरी यांच्यासाठी कमलाकर जमदाडे यांचा अंधश्रद्धा निर्मूलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
दि. १ मार्च रोजी झालेल्या शिबिराच्या समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी आनंदिदास महाजन हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ.शिवाजी पाटोदे, मारोती राहीरे, माजी चेअरमन शिवदास हलबुर्गे, सरपंच प्रतिनिधी कपिल भुसावळे, माणिकराव पाटील व मारोतराव विभूते हे उपस्थित होते.
कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.शिवाजी कांबळे यांनी प्रास्ताविकाच्या माध्यमातून सात दिवसात विद्यार्थ्यांनी राबविलेल्या विविध उपक्रमाबद्दल माहिती दिल्यानंतर विद्यार्थी प्रतिनिधी आकाश देगलूरे व विद्यार्थिनी प्रतिनिधी प्रिती गायकवाड यांनी शिबिराबद्दलचे आपले अनुभव कथन केले. याप्रसंगी मारोती राहिरे, मारोतराव विभूते आणि दिलीप भुसावळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी मारोतराव दंडे, रवी चिमणापुरे, प्रा.डॉ.डी.व्हि.जामकर, प्रा.डॉ.एस.एस.कदम, प्रा.आर.डी. शिंदे, प्रा.डॉ.सी.डब्ल्यू.गज्जेवाड, प्रा.एन.एम.ढेकळे, प्रा.डॉ.आर.जी हिंगोली, प्रा.डॉ.एस.के.लेखने, प्रा.डॉ.पि.एम.भुमरे, प्रा.सूर्यकांत जिरगे, प्रा.एस.डी.देगावकर, प्रा.ज्ञानेश्वर कोकणे, पत्रकार तानाजी शेळगावकर, आदी कर्मचारी, विद्यार्थी आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीती गायकवाड यांनी केले तर प्रा.डॉ.बालाजी डाकोरे यांनी आभार मानले.