89 नायगाव विधानसभाताज्या बातम्यानांदेड

हातात मशाल घ्या व तुतारी वाजवून गद्दारांना हद्दपार करा : खा.इमरान प्रतापगढी यांचे धर्माबाद तालुक्यातील जनतेला आवाहन

प्रकाश महिपाळे

धर्माबाद : भाजप नेते सत्तेवर येण्याअगोदर मोठमोठी स्वप्ने दाखवतात आणि मोठे आश्वासन देतात पण सतेत आल्यानंतर त्यांना दाखवलेल्या स्वप्नांनाच आणि दिलेल्या आवासनाचा विसर पडतो. त्यामुळे मतदारांनो भाजपच्या खोट्या आश्वानाला बळी पडू नका. काँग्रेसची निशाणी हात आहे हातात मशाल घ्या व तुतारी वाजवून गद्दारांना हद्दपार करा असे आवाहन काँग्रेसचे खा.इमरान प्रतापगढी यांनी केले आहे.

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा.रवींद्र चव्हाण आणि नायगाव विधानसभेच्या उमेदवार डॉ.मिनल खतगावकर यांच्या प्रचारासाठी खा.इमरान प्रतापगढी हे मंगळवारी धर्माबाद येथे आले होते. त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवातच शेरोशायरीने केली.

किमत तो बहोत बढ गई इस शहर मे धान की, लेकीन विदा न हुई बेटी किसान की, मौका मिला तो लोगो ने कुर्सी के वास्ते तस्वीर ही बिघाड दि हिंदूस्थान की… यावर उपस्थित मतदारांनी प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला. पुढे बोलताना ते म्हणाले खोटारड्यांचे सरकार बदलण्याची वेळ आली आहे. कारण महायुतीचे सरकार धोकेबाज व खोकेबाजांचे आहे यांना सत्तेतून हाकालण्याची वेळ आली आहे.

भाजपचे नेते सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जातात त्यांनी आता बटेंगे तो कटेंगे चा नारा देत आहेत, दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेते नफरत की बाजार मे मोहब्बत दुकान खोल के बैठे है त्यामुळे यावर मतदारांनी निर्णय घेण्याची वेळ आली आहे. एवढेच नाही तर लोकसभा निवडणुकीत भाजपच्या काही उमेदवारानी प्रचारात आमचे बहूमत आल्यास संविधान बदलण्याचीही घोषणा दिली होती.

परंतु चारशे पार चा नारा देणाऱ्यांना बहाद्दर मतदारांनी यांना 240 वरच अडकवले. त्यामुळे संविधान बदलण्याची मुजोरी भाषा करणाऱ्यांचे स्वप्न धुळीस मिळाले आहे यांना श्वास घेतांना गुदमरल्यासारखे होत आहे. विशेष म्हणजे सरकार चाललण्यासाठी भाजपला दोन दोन कुबड्यांचा सहारा घ्यावा लागला असल्याची टिकाही त्यांनी यावेळी केली.

नांदेड लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने मोठी व्युहरचना केली असतानीही स्व.वसंतराव चव्हाण यांनी बाजी मारली होती. मात्र यावेळी लोकसभा व विधानसभा मतदार संघाची लढाई मोठी आहे. या लढाईत मतदारांनी महाविकास आघाडीला साथ द्यावी कारण महायुती जिंकल्यास अदाणी अंबानीचे कर्ज माफ होईल तर महाविकास आघाडी सत्तेत आल्यास शेतकऱ्यांचे कर्ज माफ होईल.

वाढलेल्या महागाईमुळे ग्रामीण भागातील नागरिक परेशान आहेत पण सरकायला याचे काही देणेघेणे नाही. त्यांना फक्त फोडाफोडीचे राजकारण करुन सत्ता टिकवायची आहे. त्यामुळे रवींद्र चव्हाण व डॉ.मिनल खतगावकरांना निवडून आणायची जबाबदारी आपली आहे. काँग्रेसची निशाणी हात, हातात मशाल घ्या व तुतारी वाजवून गद्दारांना हद्दपार करा असे आवाहणही त्यांनी शेवटी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker