ताज्या बातम्यानांदेडनायगांव

आमदार पत्नीचे भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून बरबडा व करखेली गटात लागले बँनर

इच्छूकांचा हिरमोड, कार्यकर्त्यांनी सतरंज्याच उचलाव्या का ??

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : नायगाव तालुक्यातील बरबडा व धर्माबाद तालुक्यातील करखेली जिल्हा परिषदेच्या गटात भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून मोक्याच्या ठिकाणी आमदारांच्या पत्नीचे असंख्य बँनर लागल्याने इच्छूकांचा हिरमोड झाला आहे. त्यामुळे आमदाराच्या पत्नीला तिकिट मिळणार असेल, तर मग आम्ही काय फक्त सतरंज्याच उचलायच्या का? असा संतप्त प्रश्न आता कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.

पहील्यांदा मांजरम जिल्हा परिषद गटातून २०१७ निवडून आलेल्या पुनम पवार यांना आता जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे डोहाळे लागले आहेत. कारण सर्वसाधारण प्रवर्गातून निवडून येवून ओबीसी प्रमाणपत्राचा आधार घेवून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होता येते असा त्यांचा मानस दिसून येत आहे. त्यामुळे आ. राजेश पवार पत्नीसाठी सेफ मतदार संघाच्या शोधत आहेत. आमदार महोदयांना नायगाव तालुक्यातील बरबडा व धर्माबाद तालुक्यातील करखेली जिल्हा परिषद गट सुरक्षित वाटत असल्याने त्यांनी वातावरण निर्मिती करण्यासाठी या दोन्ही गटात भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून बँनरबाजी सुरु केली आहे.

नायगाव तालुक्यातील बरबडा व धर्माबाद तालुक्यातील करखेली मतदारसंघात भावी सदस्या म्हणून पुनम पवार यांनी केलेल्या ‘बॅनरबाजी’ने दोन्ही गटातील कार्यकर्त्यांत मोठा संभ्रम निर्माण झाला असून पुनम पवार नेमकं कुठून निवडणुकीत थांबणार आहेत हे अस्पष्ट असल्याने दोन्ही गटातील इच्छुक पुरते हैराण झाले आहेत. अनेक महत्वाच्या पदावर अगोदर पत्नीची वर्णी लावलेली असताना आता जिल्हा परिषद सदस्य करण्याच्या कामाला लागले आहेत. त्यांनी दोन्ही गटावर दावेदारी करतांना निष्ठावंत कार्यकर्त्या़च्या भावनेचा विचारच केला नाही. केवळ पत्नीसाठी सबकुछ अशी त्यांची सध्याची भुमिका दिसून येते.

जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे ओबीसी साठी आरक्षित झाले असल्याने कोणत्याही परिस्थितीत पत्नी जिल्हा परिषद सदस्य झाली पाहिजे यासाठी आ.राजेश पवार हे कामाला लागले आहेत. त्यांनी भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून बँनरबाजी केली आहे. सौ. पुनम पवार यांच्या दोन जिल्हा परिषदेच्या गटावरील दावेदारीमुळे इच्छुक व मोर्चेबांधणी करत असलेल्यांचा हिरमोड तर झालाच आहे आमदाराची पत्नीच दोन दोन ठिकाणी दावेदारी करत असेल तर कार्यकर्त्यांकडून आम्ही फक्त सतरंज्याच उचलायच्या काय असा सतंप्त सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

कार्यकर्त्याऐवजी घरच्यांनाच संधी…
वर्षानुवर्षांची मेहनत आणि जनसंपर्क असूनही सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळत नसल्याने कार्यकर्ते नाराज आहेत. अशी चर्चा कार्यकर्त्यांमधून होत आहे. सतत आम्हीच रँली काढायच्या, मोर्चे काढायचे, केसेस अंगावर घ्यायच्या इतकेच नव्हे तर भाऊ, दादा, ताई, वहिनी यांना निवडून आणण्यासाठी गल्लीतील शेजारी, भावकी, मित्रमंडळी यांच्याशी दुश्मनी करून आपल्या नेत्यांना भरघोस मतांनी निवडून आणावे, आणि ज्यावेळी कार्यकर्त्यांना संधी देण्याची वेळ येते तेव्हा मात्र नेत्यांच्या घरच्यांनाच संधी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker