ताज्या बातम्यानांदेडनायगांव

उमेदवारी मिळाली नाही तरी महाविकास आघाडीचेच काम करणार – शिरिष गोरठेकर

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : नायगाव विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसला (शरद पवार गट) सोडण्यात यावा आणि भुमिपुत्र म्हणून मला उमेदवारी मिळावी असा आग्रह पक्षाकडे केला आहे. परंतु पक्षाने कोणताही निर्णय घेतला तरी मी महाविकास आघाडीचेच काम करणार असल्याची माहिती शिरिष गोरठेकर यांनी दिली आहे.

शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ईच्छूक उमेदवारांच्या मुलाखती पुणे येथे दि. 5 आक्टोबर रोजी पार पडल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांचे पुत्र शिरिष गोरठेकर यांनी मुलाखत दिली. या पार्श्वभूमीवर शिरिष गोरठेकर यांच्याशी संपर्क साधून त्यांची भुमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पक्षाने नायगाव विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडावा अशी मागणी पक्षश्रेष्ठीकडे केली.

मतदारसंघाचा भुमिपुत्र म्हणून मागणी करतांना त्यांनी बापूसाहेब गोरठेकर यांच्या आठवणी ताज्या केल्या. खा.वसंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर लोकसभेला प्रा. रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी द्यावी व नायगाव विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडावा असा आग्रह धरला असल्याचे सांगितले.

पक्षाने उमेदवारी न दिल्यास पुढील वाटचालीबाबत त्यांनी दिशा स्पष्ट केली असून आम्ही मागायच काम केलय द्यायच का नाही याचा निर्णय पक्ष घेईल. उमेदवारी मिळेल न मिळेल पण शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जयप्रकाश दांडेगावकर आणि मराठवाडा प्रभारी राजेश टोपे यांचा आदेश शिरसावंद्य असेल. काहीही झाल तरी मी महाविकास आघाडीतच राहणार असून महाविकास आघाडीचेच काम करणार असल्याचे स्पष्ट केले.

खा.वसंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर गोरठेकर परिवार लोकसभेसाठी रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी मिळाली पाहिजे अशी भुमिका घेतली आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत चिखलीकरांच्या पारड्यात वजन टाकले होते. त्याचबरोबर काही दिवसापूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेवून अजित पवार गटात जाण्याची घोषणा केली होती मात्र प्रवेश केला नसल्याचे यावेळी त्यांनी आवर्जून सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker