गावाकडच्या बातम्यानांदेडनायगांव

बहुजन समाजासाठी काँग्रेस सत्तर वर्षात जे दिले नाही ते भाजपने दिले- आ.राजेश पवार

मोरे मनोहर

किनाळा :- डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानात बहुजन समाजाला हक्क व अधिकार दिलेले असताना काँग्रेस पक्षाने स्वतःच्या फायद्यासाठी इतरांना हक्क व अधिकार मिळू दिले नाहीत सत्तर वर्षांपासून बहुजन समाजाला सत्तेत स्थान मिळू तर दिलेच नाही परंतु अशा उपेक्षित समाजाच्या उन्नतीसाठी कोणतेही ठोस निर्णय घेतले नाही.

त्यामुळे अशा उपेक्षित समाजाला न्याय देण्यासाठी भारतीय जनता पार्टीने बहुजन समाजातील सामान्य नागरिकांना उपेक्षित समाजाचे नेतृत्व करण्यासाठी बहुजन समाजातील सामान्य कार्यकर्त्यांना विधान परिषदेवर घेऊन बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी 70 वर्षात काँग्रेस जे करू शकले नाही त्या अनेक कल्याणकारी योजना भाजपा राबवत आहे. लाडकी बहीण व शेतकरी सन्मान योजना सुरू केल्याने काँग्रेसच्या पोटात दुखत असल्याचे मत आमदार राजेशजी पवार यांनी व्यक्त केले.

ते लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शेळगाव गौरी तालुका नायगाव येथे दि.२४ ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अध्यक्षीय समारोप करताना आमदा राजेश पवार बोलत होते. ते पुढे बोलताना म्हणाले की आमच्यासारख्याना सामान्य जनतेचा आशीर्वाद आहे म्हणूनच सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी भाजपा वचनबद्ध असुन तुमचे स्वप्न साकार करण्यासाठी कोणाच्या भुलथापानाबळी न पडता आपली ताकद आपल्या भावाच्या पाठीमागे उभी करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमाच्या कार्यक्रमाचे उद्धघाटक म्हणून माजी जिल्हा परिषदेच्या सदस्या पुनमताई राजेश पवार हे होत्या तर सत्कारमूर्ती म्हणून उमरखेड विधानसभेचे आमदार नामदेवजी ससाने, विधान परिषद सदस्य आ.अमित गोरखे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रमुख पाहुणे म्हणून रामतीर्थ पोलीस स्टेशनचे सपोनी श्रीधर जगताप, स्वागत अध्यक्ष शेळगाव गौरीचे सरपंच प्राचार्य मनोहर तोटरे, उत्तम गवाले, कैलास भालेराव, प्रितम गवाले, गंगाधर कोतेवार, राजेंद्र रेड्डी, श्रीहरी देशमुख, अवकाश पाटील, प्रकाश पाटील हेंडगे, शिवाजी पाटील, राजेंद्र पाटील यांसह आदीं मान्यवर उपस्थिती होते.

आर्टीची स्थापना करण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या आमदार राजेशजी पवार,उमरखेड विधानसभेचे आमदार नामदेवजी ससाने, विधान परिषद सदस्य आ.अमित गोरखे यांचा कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष शेळगाव गौरीचे सरपंच प्राचार्य मनोहर तोटरे व जयंती मंडळाच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.

यावेळी विधान परिषदेचे आमदार नामदेवजी ससाने आणि अमित गोरखे, कार्यक्रमाच्या उद्घाटक पूनम ताई पवार यांनी आपले सविस्तर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोगत गावचे सरपंच तथा प्राचार्य मनोहर तोटरे यांनी केले.

कार्यक्रमाच्या अंरभी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करुन ध्वजारोहण करण्यात आले. दुपारी दोन वाजता अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची गावातील प्रमुख मार्गाने भव्य मिरवणूक काढण्यात आली. दुस-या क्षेत्रात सायंकाळी सात वाजता आर्टीची स्थापना करण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या मान्यवरांचा सत्कार सोहळा व त्यांनंतर स्पतखंजेरीवादक महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचा प्रबोधनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

सत्यपाल महाराजांनी आपल्या प्रबोधनातुन स्वच्छता, व्यसनमुक्ती, घनकचरा नियोजन, जातिभेद, अंधश्रद्धा, शिक्षणाचं महत्त्व, हगणदारी मुक्त गाव, स्त्री भ्रूण हत्या या विषयांबरोबरच आजच्या तरुण पिढीने व्यासांना पासुन दुर व्हा व मोबाईल चा वापर कमी करुन शिक्षणाकडे लक्ष द्यावे असे अनमोल विचार प्रबोधनातु मांडले.

यावेळी परीसरातील प्रतिष्ठित नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य व समाज बांधवांनी परीश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker