ताज्या बातम्यानांदेडराजकारण

बौद्ध समाजाला या वर्षी देगलूर बिलोली मतदार संघातूनविधानसभेचे तिकीट कोणता पक्ष देणार…?

दिग्गज उमेदवार ईच्छुक…

जयवर्धन भोसीकर

नांदेड :- देगलूर बिलोली मतदार संघातून आज पर्यंत काँग्रेस भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस ह्या पक्षांनी तिकीट दिलं नाही त्या मुळे बौद्ध समाजाला प्रतिनिधित्व भेटल नाही, आणि कोणत्याही पक्षाने तेवढे प्रबळ उमेदवार असताना सुद्धा त्याना सत्ते पासून वंचित ठेवलं.

या वर्षी काँग्रेस, भाजपा, शिवसेना शिंदे गट, उध्दव ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस सर्वच पक्षा कडून इचुक उमेदवार डझनभर आहेत, पण जे खरच पक्षात, चळवळीत काम केलेत असे बौद्ध समाजाचे उमेदारांपैकी काही जे रेस मध्ये आहेत त्या पैकी सुरेश दादा गायकवाड, मंगेश कदम, गंगाधर सोंडारे, निवृत्ती कांबळे, सुभाष गायकवाड, शत्रुघ्न वाघमारे ह्यांच्या पैकी यांचे पक्ष यांना तिकीट देतील का? हे बघणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

बौद्ध उमेदवारांना आज पर्यंत अनेक पद्धतीचे राजकारण करून डावलण्यात आले…

सुरेश दादा गायकवाड

फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार तथा पँथर यांचा जनसंपर्क देगलूर बिलोली मतदरसंघात मोठा आहे दादा यांच्या नावातच वलय आहे, जुनी जाणती माणस, युवा वर्ग सुरेश दादा गायकवाड यांना मानणारा आहे, त्यांना जर कोणत्या मोठ्या पक्षाने तिकीट दिले तर ते निवडून येऊ शकतात. एवढे दमदार उमेदवार ते आहेत. पण कोणता पक्ष दादांना साथ देईल की देणार नाही हे बघणे महत्वाचे, चांगल्या चांगल्या बड्या राजकारणी लोकांना दादाची भीती आहे.म्हणून तर त्यांना नेहमी सत्ते पासून दूर ठेवण्यात आले. आता एक चांगली संधी त्यांना आहे.

मंगेश कदम

हे सुध्दा अत्यंत तगडे उमेदवार आहेत,शिवसेना शिंदे गटाचे एस.सी.एस.टी, ओबीसी चे ते जिल्हाध्यक्ष असून त्यांनी गेल्या दोन वर्षापासून सतत चे दौरे त्यांचे चालू आहेत, मोठा जनसंपर्क त्यांचा आहे, बिलोलीत त्यांचे लहानपण गेले आहे, नांदेड महापालिकेत ते नेहमी सत्तेत असतात, आ.बालाजी कल्याणकर यांचे ते निकटवर्तीय मित्र आहेत, सामजिक कामे त्यांची या भागात आहेत, शिंदे गटाकडून ते आग्रही आहेत.

गंगाधर सोंडारे

हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावान म्हणून त्यांची ओळख आहे, ते बऱ्याच वर्षापासून आमदारकी चे स्वप्न उराशी बाळगून आहेत, पण काँग्रेस ने त्यांना काही आमदारकीचे तिकीट दिल नाही, नांदेड काँग्रेस जडण घडणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. देगलूर बिलोली मतदार संघात गावागावात त्यांचा जन संपर्क आहे हे पण काँग्रेस कडून ईच्छुक उमेदवार आहेत.

निवृत्ती कांबळे

हे जिल्हा परिषदे वर निवडून गेलेले नेते आहेत, काँग्रेस पक्षाला देगलूर तालुक्यात विजयी करण्यात यांचा महत्त्वाचा सहभाग त्यांचा आहे, ते पण काँग्रेस कडून ईच्छुक आहेत. यांचा पण जन संपर्क चांगला आहे.

सुभाष गायकवाड

हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून ईच्छुक उमेदवार आहेत, जिल्हा परिषद बिलोली तालुक्यातील स्थानिक राजकारणात महत्वाचा वाटा त्यांचा आहे, शरद पवार यांचे ते एकनिष्ठ आहेत. देगलूर बिलोलीत मतदार संघात दांडगा जनसंपर्क असणारा नेता म्हणून त्यांची ओळख. जवळच्या नेत्यांनी त्यांना अधांरात ठेवून त्यांचे तिकीट कापल होत. नाही तर ते आमदार म्हणून निवडून आले असते.

शत्रुघन वाघमारे

हे भीम शक्ती सामजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत, काँग्रेस पक्षा कडून ते ईच्छुक आहेत खा.चंद्रकांत हंडोरे साहेबाचे ते निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जातात. जनसंपर्क मोठा असणाऱ्या पैकी, मुंबई वारी यांची पण चालूच आहे.

वंचित बहुजन आघाडी ही वंचितांच्या हिताचे राजकारण करत आली आहे, त्यांनी पहिल मातंग समाजाला उमेदवारी दिली नंतर बौध्द समाजाला उमेदवारी दिली. आता ह्या वेळेस बौद्ध उमेदवार देतील का हे पण बघणे महत्वाचे आहे. वंचित कडे पण तिकिटा साठी रांगच रांग आहे.

कोण कोण ईच्छुक आहेत एल.एन.देवकरे भोसीकर, मा.न्यायाधीश, गंगाधर सोनकांबळे, असे अनेक ईच्छुक उमेदवार प्रत्येक पक्षात आहेत. सोशल मीडियावर भावी आमदारांची मांदियाळी… भावी आमदार सोशल मीडियावर रोज एक जन्म घेत आहेत…

अवशे नवशे, जिंदगीत निवडून न येणारे. निवडणूक आली की हवेतून घिरट्या घेणारे, नुसते फॉर्म भरणारे, कोणी पण ओळख नसणारे रिटायर झाल्यावर समाजाची आठवण करणारे व्यापार असणारे बडे नेते मंडळींशी जवळीक असणारे अशा भावी आमदारांची रांगच रांग आहे.

ह्या सर्वांना बाजूला फेकून जो खरा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा पुढे नेईल असा उमेदवार काँग्रेस भाजपा, शिवसेना दोन्ही गट.राष्ट्रवादी काँग्रेस ह्या सर्व पक्षांना बौद्ध उमेदवार दिसेल का? दिसला तर तिकीट देतील का? हा महत्वचा मुद्दा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker