ताज्या बातम्यानांदेडनायगांव

अखेर भास्कर भिलवंडे यांना न्याय मिळाला : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून ओळख असेलतर भास्कर पाटील भिलवंडे यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे नांदेड जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल अभिनंदन करण्यात येत आहे.

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला खिळखिळे करण्याचा प्रयत्न होत असताना नायगाव विधानसभा मतदारसंघात शरद पवारांची राष्ट्रवादी जीवंत ठेवण्याचे काम निष्ठेने भास्कर पाटील भिलवंडे हे करत आलेले आहेत. असे असतांनाही काही त्यांना जिल्ह्यातील काहीही सतत डावलण्याचा प्रयत्न करत होते. आजपर्यंत त्यांचे काम व पक्षाप्रती असलेली निष्ठा पाहता त्यांना जिल्हाध्यक्ष पदी निवड करणे अपेक्षित होते.

मात्र जिल्ह्यावरील काही नेते कुरघोडीचे राजकारण करण्यात व्यस्त होते. परंतु कुरघोडी करणारेही टिकले नाहीत दुसरीकडे सतत डावलण्याचा उद्योग करण्यात आल्यानंतरही भिलवंडे यांनी पक्षासाठी तळमळीने काम करत राहीले आहेत.
उशिरा का होईना भास्कर दादा भिलवंडे यांच्या कामाची पक्षाने दखल घेतली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भास्कर दादाची राष्ट्रवादी काँग्रेसच्या नांदेड जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड केली असून त्यांनीच निवडीचे पत्र दिले. उशिरा का होईना पण पक्षाने एका सच्चा व निष्ठावंत शिलेदाराला न्याय मिळाल्याने अभिनंदन करण्यात येत आहे.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवकचे नांदेड जिल्हाध्यक्ष धनंजय सुर्यवंशी, कार्याध्यक्ष विक्रम नागशेट्टीवार, नायगाव ता.अध्यक्ष गजानन पवार, श्याम चोंडे व माधव कोरे यांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker