राशन दुकानदारांकडे तुमचे आधार पडताळणी करा, अन्यथा राशनला मुकाल

शेषेराव कंधारे
नायगाव :- तालुक्यातील शासनाने अंत्योदय, प्राधान्य कुटुंब, एपीएल (शेतकरी कार्ड) यासह अन्य योजनेतील सर्व रेशन कार्डधारकांनी आपल्या नजीकच्या रेशन दुकानदाराशी संपर्क साधुन आपले व आपल्या सर्व कुटुंब सदस्यांचे आधार पडताळणी (ई केवायसी) ३१ ऑक्टोबर पर्यंत करून घेणे बंधनकारक असुन अन्यथा दि.१ नोव्हेंबरला शिधापत्रिकेतून नांव वगळले जाईल अशी माहिती नायगाव च्या तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड, पुरवठा अधिकारी दराडे यांनी दिली आहे.
रेशनकार्डवर मरण पावलेल्या अनेकांची नावे आहेत. त्यामुळे त्यांची नावे काढून टाकण्यात येणार आहेत. त्यामुळे आता सर्व शिधापत्रिकाधारकांना म्हणजेच ज्यांची नावे शिधापत्रिकेत आहेत, त्यांनी जवळच्या स्वस्त धान्य दुकानात जाऊन ई पॉस
मशीनमध्ये आपले आधार क्रमांक टाकून व बोटांचे ठसे किंवा डोळे स्कॅन करून ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी अन्यथा कोणत्याही सदस्याने ई-केवायसी न केल्यास त्याचे नाव शिधापत्रिकेतून वगळले जाईल.
आजही अनेक गावातील शिधापत्रिकाधारकांना
ई-केवायसी करण्यासाठी संबंधित राशन दुकानदारांनी माहितीच दिसलेली नाही त्यामुळे केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे सर्व कार्डधारकांनी ३१ ऑक्टोबरपूर्वी ई-केवायसी करून घेणे आवश्यक आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत ई- केवायसी प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्यांना रेशन मिळणे बंद होईल.
अशा लोकांची नावेही शिधापत्रिकांवरून काढून टाकली जातील आणि ज्यांनी ई-केवायसी केले नसेल, त्यांची शिधापत्रिका रद्द केली जातील. यानंतर या लोकांना सरकारच्या रेशन योजनेचा लाभ मिळणार नाही अशी माहिती तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड, पुरवठा अधिकारी दराडे यांनी दिली आहे.
धुप्पा येथील कार्डधारकांना ई- केवायसीची माहितीच नाही…
नायगाव तालुक्यातील धुप्पा येथील आजपर्यंत राशन कार्डधारकांना ई- केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेण्यासाठी ना तहसीलकडुन माहिती मिळाली ना राशन दुकानदारांकडून माहिती देण्यात आली नाही त्यामुळे येथील कार्डधारक ई- केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची की नाही यासाठी मोठ्या संभ्रमात पडले असुन ई- केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची असेल तर तात्काळ संबंधित राशन दुकानदारांना आदेश देऊन ई- केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी अन्यथा कार्डधारक अनेक योजनांच्या राशनापासुन वंचित राहावे लागले.