लाडकी बहीण योजनेसाठी सक्षम अधिकाऱ्या ऐवजी तलाठ्याचे प्रमाणपत्र ग्राह्य धरावे – कांबळे

मोरे मनोहर
किनाळा :- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला वर्गाला खुश करण्याकरिता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली असली तरी या योजनेस पात्र ठरण्यासाठी घालण्यात आलेल्या अनेक जाचक अटीमुळे मोठ्या प्रमाणात महिला या योजनेपासून वंचित राहू शकतात जर महिलांना खरोखरच लाभ द्यायचा असेल तर उत्पन्न व रहिवाशांचे प्रमाणपत्र हे सक्षम अधिकाऱ्या ऐवजी गावातील तलाठी व ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे बिलोली तालुका कोषाध्यक्ष गंगाधर कांबळे यांनी केले आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांचे उत्पन्नाचे आणि रहिवाशांचे प्रमाणपत्र अनिवार्य असल्याचे सांगितले जात असल्याने सक्षम अधिकाऱ्यांचे उत्पन्नाचे व रहिवाशांचे प्रमाणपत्र काढण्यासाठी ठिकठिकाणी असलेल्या सेतू सुविधा केंद्र व तहसील कार्यालयासमोर प्रमाणपत्र काढण्यासाठी मोठ्या रांगाच्या रांगा लागल्या असून पंधरा जुलै ही शेवटची तारीख असल्याने या योजनेस पात्र होण्यासाठी अनेक जण अवाच्या सव्वा पैसा खर्च करून हे प्रमाणपत्र काढण्यासाठी धावपळ करत आहेत.
गावातील तलाठी व ग्रामसेवक यांनी दिलेल्या प्रमाणपत्रावरच सक्षम अधिकाऱ्याकडून प्रमाणपत्र दिले जाते हे दोन्ही अधिकारी शासनाचेच असल्याने शासनाने गावातील तलाठी व ग्रामसेवक यांनाच योग्य व पात्र उमेदवारांनाच प्रमाणपत्र देण्यात यावे असे सक्त आदेश देऊन सक्षम अधिकाऱ्यांचे काढावे लागणारे प्रमाणपत्र रद्द करून या योजनेसाठी योग्य व गरजू अशा महिलांना पात्र ठरविण्यासाठी तलाठी व ग्रामसेवक यांचेच प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे बिलोली तालुका कोषाध्यक्ष गंगाधर कांबळे यांनी केले आहे.
पेरणीच्या दिवसात शेतकरी पेरणीसाठी असलेला पैसा शेतीत खर्च केल्यानंतर शासनाने ही योजना लागू केल्याने या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारे कागदपत्र जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ करत असताना कित्येक अशिक्षित व सामान्य मोलमजुरी करणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक होत असुन अनेकांचा वेळ व पैसा खर्च होऊनही वेळेवर हे प्रमाणपत्र मिळतील का अशी शंका अनेकांना निर्माण झाली.
असून एका एका गावातून किमान दीडशे ते दोनशे महिला सक्षम अधिकाऱ्याकडून प्रमाणपत्र काढण्यासाठी तहसील कार्यालयाकडे गेले तर हजारो अर्ज एकाच वेळी तहसील मध्ये गेल्याने हे प्रमाणपत्र वेळेमध्ये मिळतील की नाही अशी अनेकांना भीती असल्याने हे प्रमाणपत्र वेळेत काढुन देतो असे सांगत काही तहसील समोरील मंडळी सामान्य नागरिकांना आम्ही तुमचे वेळेत प्रमाणपत्र काढून देतो म्हणून आवाच्या सभा पैसे घेत असल्याने सामान्य जनतेची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी शासनाने याकडे तात्काळ लक्ष देऊन शासनाच्या अधिकारी असलेल्या तलाठी व ग्रामसेवक यांच्याच प्रमाणपत्रांना ग्राह्य धरून या योजनेचा लाभ घेण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्राची अट रद्द करावे असी मागणी वंचित बहुजन आघाडीचे बिलोली तालुका कोषाध्यक्ष गंगाधर कांबळे यांच्या सह अनेक सामान्य नागरिकांतून केले जात आहे.