ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

नेरली येथील दूषित पाणी दुर्घटनेची तात्काळ चौकशी करून दोषीवर कारवाई करा : प्रा.रविंद्र चव्हाण

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : गावाला पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाकीतील पाणी पिल्याने नेरली येथील ३०० ते ४०० नागरिकांना जुलाब आणि उलट्या झाल्या. ही बातमी समजतात शनिवारी प्रा. रवींद्र चव्हाण यांनी नेरली येथे भेट देऊन गावकऱ्यांशी संवाद साधला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्याशी संपर्क साधून दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

नेरली या गावाला गावच्या सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेच्या टाकीतूनच पाणी पुरवठा केला जातो. परंतु शुक्रवारी दि.२७ रोजी रात्री काही नागरिकांना मळमळ होवून चक्कर येणे व उलट्या आणि जुलाब होण्यास सुरुवात झाली. नंतर अशा रुग्णांत प्रचंड वाढ झाली त्यामुळे शनिवारी (दि.२८) रोजी सकाळी मिळेल त्या वाहनाने रुग्णांना शासकीय आणि खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्रीतून दोनशे पेक्षा अधिक जणांना विषबाधा झाली. शनिवारी सकाळ पासुन देखील अनेकाना असाच त्रास झाला.

रुग्नांची संख्या ३०० ते ४०० च्या जवळपास वाढली या रुग्नांची तपासनी करुन उपचार करण्यात आले.
दूषित पाणीपुरवठ्यामुळे जुलाब आणि उलट्या झाल्याची बातमी समजतात आज रोजी नेरली येथे प्रा. रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी भेट देऊन गावकऱ्यांशी संवाद साधला. घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती घेऊन खाजगी रुग्णालयात रुग्णांची भेट घेऊन तब्येतीची चौकशी केली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडे धाव घेऊन झालेल्या घटनेची

चौकशी करून पाणीपुरवठा योजनेच्या कार्यान्वयीन यंत्रणा तसेच कंत्राटदार चौकशी कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल कर्णवाल आणि निवासी जिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्याकडे केली आहे.
यावेळी अब्दुल सत्तार हणमंतराव बेटमोगरेकर, डीपी सावंत, बबन बारसे, महेश खेडकर, दत्ता कोकाटे, राजेश पावडे, विठ्ठल पावडे, निलेश पावडे, शंकर शिंदे व महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख कार्यकर्ते गावातील मंडळी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker