काहाळा बु येथे मासिक ग्रामसभा न घेतल्याने सरपंच अपात्र
जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईने खळबळ

शेषेराव कंधारे
नायगाव :- नायगाव तालुक्यातील कहाळा बु. ग्रामपंचायतीचे सरपंच शेख जावेद सत्तार शेख यांनी सरपंच पदाचा पदभार सांभाळल्यापासून मासीक ग्रामसभा घेतल्या नसल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्यांना नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी उर्वरीत कालावधीसाठी सरपंच पदावर कार्यकरण्यास अपात्र असल्याचे घोषीत केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईमुळे नायगाव तालुक्यांत खळबळ उडाली आहे.
सरपंचाने ग्रा. पं. सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करुन नियमानुसार ग्रामसभा व मासीक सभा घेतल्या नसल्यामुळे त्यांना उर्वरीत कालावधीसाठी सरपंच पदावरून बडतर्फ करावे असा विवाद अर्ज कहाळा येथील सदस्य सुनील अंबादासराव लुंगारे यांनी अॅड. एन. जे. काकडे यांच्यामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केला.
सदरील विवादात संबंधीताना नोटीसा पाठवून आपआपली बाजु मांडण्याची संधी दिली व गट विकास अधिकारी, पं. स. नायगाव यांच्याकडून ग्रामसभा व मासीक सभेचा अहवाल मागविला. परंतू ग्रामसभा घेतले नसल्याचे निष्पन्न झाल्याने कहाळा येथील सरपंचांना उर्वरित कालावधीसाठी बडतर्फ करण्यात आले.
शासनाच्या नियमानुसार सरपंच पदावर असताना मासीक ग्रामसभा घेण्याचे अनिवार्य नियम ठरलेले आहेत. असे असताना नायगाव तालुक्यातील काहाळा बु गावातील ग्रामपंचायत मध्ये सन २०२२ मार्च ते २०२३ जुन अशा एकुण चार मासीक सभा सरपंच शेख जावेद सत्तार शेख यांनी आपल्या सरपंचपदाच्या कार्यकाळात ग्रामपंचायतमध्ये मासिक सभा न घेतल्याची तक्रार ग्रामपंचायतीचे सदस्य सुनिल पाटील लुगारे यांनी अॅड. एन. जे. काकडे यांच्यामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केला.
यानंतर नायगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी दिलेल्या चौकशीचे आदेश अहवाल सादर करण्याचे सांगितले. या अहवालात सरपंच शेख जावेद सत्तार शेख दोषी आढळल्याने त्यांना अपात्र करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईमुळे नायगाव तालुक्यांत खळबळ उडाली आहे.