इलेक्ट्रॉनिक ईव्हीएम मशीन मतदानासाठी सुरक्षित असल्याचे शंकरनगर येथे प्रात्यक्षिक

मोरे मनोहर
किनाळा :- भारतीय लोकशाही मजबूत करण्यासाठी व मतदानाचा पवित्र अधिकार बजावण्यासाठी ‘इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राणाची कास थरू या, चला लोकशाहीला स्मार्ट करूया’ म्हणत शंकरनगर येथील बसस्थानकावर ईव्हीएम मशीनचे प्रत्याक्षीत 3 ऑक्टोबर रोजी मतदारांना दाखवण्यात आले.
मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे तरच योग्य उमेदवाराची निवड होऊ शकते यासाठी निवडणूक आयोगाकडून बनवण्यात आलेले इलेक्ट्रॉनिक ईव्हीएम मशीन च्या माध्यमातून घेतल्या जाणारे मतदान हे बदलता येत नाही परंतु बायलेट पेपरच्या माध्यमातूनच मतदान व्हावे असा मतदारांचा व अनेकांचा सूर ऐकायला येत असताना या इलेक्ट्रॉनिक ईव्हीएम मशीन वर केलेले मतदान बदलत नाही व केलेले मतदान सुरक्षित राहू शकते याचे प्रात्यक्षिक शंकरनगर येथे दाखवुन इलेक्ट्रॉनिक ईव्हीएम मशीन सुरक्षित असल्याचे समजावून सांगण्यात आले.
शंकरनगर येथे इलेक्ट्रॉनिक ईव्हीएम मशीनवर अनेक मतदारांचे प्रत्यक्ष मतदान घेऊन ते मतदान आपण कोणाला केले ते बरोबर आहे की नाही हे लगेच मशीनवर दाखवले यावेळी बिलोली तहसीलच्या वतीने ही जनजागृती राबवली जात असताना शंकरनगर येथील बस स्थानकाजवळ रामतीर्थ सज्याचे मंडळ अधिकारी कल्पना मुंडकर, तलाठी विजय पाटील जाधव यांनी ईव्हीएम मशीनच्या सुरक्षिततेबाबत जनतेच्या मनात असलेली सब्रम अवस्था दूर करून जनतेने मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावावा असे आव्हान यावेळी त्यांनी केले.
यावेळी मंडळ अधिकारी कल्पना मुंडकर, तलाठी विजय पाटील जाधव, संतोष शहाणे, ओमकार पंधरवडे, पोलीस पाटील खुशाल रोकडे, पोलीस काॅन्स्टेबल गंदकवाढ, बालाजी भोसले, शिवलिंग देगलूरे, संजय लांबतलवारे, रजाख शेख, मकदुम शेख या सह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.