भारतीय लहुजी सेनेचे सरसेनापती व्हि.जी रेड्डी यांचे निधन टाकळी येथे 5 मार्च रोजीअंत्यविधी

मोरे मनोहर
किनाळा :- टाकळी बु.तालुका नायगाव येथील भारतीय लहुजी सेनेचे सरसेनापती व्यंकट गोविंद रेड्डी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने नांदेड येथील विनायक रुग्णालयात वयाच्या 65 व्या वर्षी दिनांक 1 मार्च रोजी सायंकाळी 8=30 वाजता दुखद निधन झाले असून त्यांचा अंत्यसंस्कार मूळ जन्म गावी टाकळी बु. तालुका नायगाव येथे 5 मार्च रोजी दुपारी 2 वाजता करण्यात येणार आहे.
ग्रामीण भागात सामान्य कुटुंबात जन्म घेऊन परिस्थितीची जाण असलेल्या व्हि. जी. रेड्डी यांनी बुद्धीच्या जोरावर मुंबई फोर्ट येथील बँक ऑफ बडोदा शाखेत ब्राॅच मॅनेजर म्हणून कार्य करताना सामाजिक कार्य करण्याच्या दूरदृष्टीकोनातून 1985 मध्ये भारतीय लहुजी सेना स्थापन करून समाजाचे दायित्व पूर्ण करण्याचे कार्य केले.
गेल्या अनेक वर्षापासून भारतीय लहुजी सेनेच्या माध्यमातून समाजातील उपेक्षित पीडित अन्यायग्रस्त नागरिकांना न्याय देण्यासाठी त्यांनी आपल्या संघटनेच्या माध्यमातून अनेक लढे देऊन अनेकांना न्याय देण्याचे काम त्यांनी केले त्यांच्या या अकाली निधनामुळे बहुजन समाजात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
व्हि.जी. रेड्डी यांचे पार्थिव देह नांदेड येथील शासकीय रुग्णालयात कोल्ड स्टोअर मध्ये ठेवण्यात आलेले असून त्यांचा अंत्यविधी मूळ जन्मगाव असलेल्या टाकळी बु. तालुका नायगाव येथे 5 मार्च रोजी दुपारी दोन वाजता करण्यात येणार असल्याची माहिती रेड्डी कुटुंबीयांच्या वतीने देण्यात आली आहे.
व्हि.जी.रेड्डी यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी दोन मुले, सुना, नात असा मोठा परिवार असून त्यांचा एक मुलगा अभिजीत रेड्डी हा बाहेर देशात स्पेन मध्ये अटलांटिक महासागरात बोट हाउस कीपिंग मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत तर दुसरा मुलगा अमित रेड्डी मुंबई येथे मेकॅनिकल इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे तर मुलगी ही देखील मुंबई येथे सीनियर एज्युकेटेड इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे.
व्हि जी.रेडी यांच्या दुखद निधनाबद्दल बिलोरी देगलुर विधानसभेचे आमदार जितेश अंतापुरकर यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून रेड्डी कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.