तालुका व्यवस्थापकांना नियुक्ती देण्यास टाळाटाळ : कु.स्नेहल पटेल यांचा आत्मदहनाचा इशारा

New Bharat Times नेटवर्क
नंदूरबार : आपले सरकार सेवा केंद्रांतर्गत कार्यरत असलेल्या काही तालुका व्यवस्थापकांना नियुक्ती आदेश दिले आहेत तर काहींना नियुक्ती देण्यासाठी कंपणीकडून टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे वंचित राहिलेल्या तालुका व्यवस्थापक यांना दि. १५ मार्च २०२५ शनिवार पर्यंत नियुक्ती न दिल्यास दि.१६ मार्च २०२५ ते २० मार्च २०२५ या ४ दिवसाच्या कालावधीत कोणत्याही क्षणी कोणत्याही वेळी केव्हाही ग्रामविकास विभाग, बांधकाम भवन मुंबई येथे आत्मदहन करण्यात येईल असा इशारा नंदुरबार पंचायत समितीचे व्यवस्थापक कु. स्नेहल कांतीलाल पटेल यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल यांना पाठवलेल्या निवेदनात दिला आहे.
राज्यातील नागरिकांना विवध प्रशासकीय विभागअंतर्गत आवश्यक असलेले सेवा दाखले (G2C), E-Gramswaraj, जन्म-मृत्यू, विवाह नोंद तसेच ग्रामपंचायत अनुषंगिक १ ते ३३ नमुने, GeM Portal, E-TENDERING तसेच इतर व्यावसायिक सेवा (B2C), जास्तीत जास्त प्रकारच्या बँकिंग सेवा (FI) इत्यादी सेवा ग्रामीण जनतेला एकाच केंद्रावर त्यांच्या रहिवासी क्षेत्रातच कालबद्ध स्वरुपात मिळाव्या, या हेतूने राज्यात पंचायतराज संस्थामध्ये “आपले सरकार सेवा केंद्र” (ASSK) प्रकल्प राबविण्यात आलेला आहे.
आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्प हा २०१६ साली CSC-SPV CSC- या कंपनी ला देण्यात आला. त्यानंतर CSC-SPV कंपनी ने मनुष्यबळ पुरवठा करण्यासाठी S2 Infotech International कंपनी ची नेमणूक करण्यात आली. तदनंतर CSC-SPV या कंपनीने प्रकल्प संचालनामधील विविध त्रुटीमुळे व अन्यकारणामुळे तब्बल ७ वर्षा नंतर जानेवारी २०२४ मध्ये त्या S2 Infotech International या कंपनीचा ठेका (Contract) रद्द करण्यात आला.
त्यानंतर शासनाने ३० जून २०२४ रोजी ग्रामपंचायत आपले सरकार सेवा केंद्र हा प्रकल्प महा-आयटीला देण्यात आला. परंतु महा-आयटी ने सदर प्रकल्प राबवण्यास स्पष्ट नकार शासनास कळविला. त्यामुळे १९ सप्टेंबर २०२४ रोजी ग्रामविकास विभागाने शासन निर्णय काढून आपले सरकार सेवा केंद्र हा प्रकल्प रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड व आई टी लिमिटेड या कंपनीला प्रकल्प देण्यात आला. व सदरील दोन्ही कंपनीने मनुष्यबळ भरण्यासाठी AKSENTT TECHNOLOGY SERVICES या कंपनीची निवड केली.
ज्या दोन कंपनी रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड व आई टी लिमिटेड ह्या कंपनी आहेत या फक्त नावाला आहेत यांना या प्रकल्पातला त्यांना कसलाही गंध नाही. नावाला या कंपनी असून सर्व कामकाज AKSENTT TECHNOLOGY SERVICES च्या मनमर्जीने व हुकूमशाहीने चालू आहे. जे काही ऑफर लेटर देत आहे त्यातील अटीसुद्धा चुकीच्या पद्धतीने लादून ऑफर लेटर वर करार केला जात आहे. नियुक्ती आदेश देतानाही भेदभाव करण्यात येत आहे.
आधीच ८ महिन्यापासून नियुक्ती नसून खुपच बिकट व हलाखीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यात कुठेही हाताला काम नसतांना कसेबसे उदरनिर्वाह करावा लागत आहे. त्यात जर कारण नसतांना नियुक्ती न न देता हेतुपुरस्कर त्रास दिला जात असेल तर मग मला जागून काहीही उपयोग नाही व माझ्याकडे आत्महत्या केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही अशी खंतही स्नेहल पटेल यांनी राज्यपालांना पाठवलेल्या पत्रात नमूद केली आहे.
माझ्या निवेदनाची दखल न घेतल्यास आणि वंचित राहिलेल्या तालुका व्यवस्थापक यांना दि. १५ मार्च २०२५ शनिवार पर्यंत नियुक्ती न दिल्यास दि.१६ मार्च २०२५ ते २० मार्च २०२५ या ४ दिवसाच्या कालावधीत कोणत्याही क्षणी कोणत्याही वेळी केव्हाही ग्रामविकास विभाग, बांधकाम भवन मुंबई येथे आत्मदहन करण्यात येईल असा इशारा नंदुरबार पंचायत समितीचे व्यवस्थापक कु.स्नेहल कांतीलाल पटेल यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल यांना पाठवलेल्या निवेदनात दिला आहे.
माझ्या आत्मदहणाला शासन व सदरील कंपनी कंपनीचे मालक, डायरेक्टर, प्रकल्पीय संचालक व जे कोणी हेतू पुरस्कर इतर आमचे वरिष्ठ व्यक्ती मग ते कोणीही असतील की तालुका व्यवस्थापक यांना घेऊ नका म्हणून त्रास देणारे कर्मचारी असतील ते सर्व जबाबदार असतील असा इशाराही दिला आहे.