कवळे गुरुजी यांची भायेगाव येथील हणमंते परिवारास सांत्वन पर भेट : मुलांच्या शैक्षणिक खर्च उचलणार

New Bharat Times नेटवर्क
उमरी : हरवलेलं छत्राची आई बनली व्हीपीके पतसंस्था वारस मुलाला दत्तक घेऊन शैक्षणिक खर्चाची घेतली जबाबदारी घेतली तसेच सातारचे व्याही महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मा. ना. मकरंद आबा पाटील यांना भायेगाव येथील झालेल्या दुर्दैवी घटनेची माहिती दूरध्वव्दारे देऊन जिल्हाधिकारी नांदेड व उमरी तहसीलदार प्रशांत थोरात यांना तात्काळ मदत करण्याची सुचना द्यावी अशी केली मागणी भाजपचे नेते मारोतराव कवळे गुरुजी यांनी केली.
सामाजिक बांधिलकी जोपासात आपल्या व्हीपीके पतसंस्थांच्या वतीने मुलांच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी घेतली.
भायेगाव येथील दि.7 जून रोजी गोदावरी नदीपात्रात कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकींसह पुतणीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील भायेगाव येथे शनिवारी दुपारी बारा वाजता घडली. महानंदा भगवान हणमंते (वय 35), पायल भगवान हणमंते (14), ऐश्वर्या मालू हणमंते (12) अशी मृतांची नावे आहेत. महानंदा दोघींना घेऊन कपडे धुण्यासाठी नदीवर गेली होती. कपडे धूत असताना बाजूला पाण्यात खेळत असलेली पायल खड्यात बुडायला लागली. आई महानंदाने तिला वाचविण्याचा प्रयत्न केला.
मात्र, दोघीही पाण्यात बुडाल्या. यावेळी ऐश्वर्या या दोघींचा हात धरायला गेली. तर तीही पाण्यात बुडाली.ही बातमी समजताच नांदेड जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे नेते व्हीपीके पतसंस्थेचे चेअरमन मारोतराव कवळे गुरुजी यांनी तात्काळ सांत्वन पर भेट देऊन वारस मुलाला शैक्षणिक खर्चाची जबाबदारी घेत दत्तक घेतले यावेळी गावातील तंटामुक्ती अध्यक्ष आनंदराव पाटील कदम, मधुकर पाटील बोळसेकर, मारोतराव सर्जे, बापूराव पाटील शिंदे, ज्ञानेश्वर पाटील कदम, पतसंस्थेचे सचिव नागनाथ पांचाळ, गोविंदराव पाटील राहटीकर, भगवान कोकणे, सह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.