ताज्या बातम्यानांदेडनायगांव

मन्याड नदीला आलेल्या पुरात वाहून जाणाऱ्या दोघांचे रामतीर्थ पोलीसांनी वाचवले प्राण

मोरे मनोहर

किनाळा :- नरसी- देगलूर राज्य महामार्गावर असलेल्या टाकळी -अटकळी गावामध्ये मन्याड नदीला आलेल्या पुराचे पाणी शिरले असून देगलूर – नांदेड राज्य महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी वाढली असताना पाण्याचा अंदाज न घेता पाण्यातुन पिकअप घेऊन जात असताना पिकप वाहून जाऊन एका झाडाला अडकला असता या पिकप मधे अडकलेल्या दोघांना स्वतःच्या जीवाची परवा न करता रामतीर्थ पोलिसांनी पाण्यात उतरुन येथील स्थानिक लोकांच्या मदतीने बाहेर काढल्याने दोघांचेही प्राण वाचले.

गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाल्याने बारूळ धरणातील पाणी मन्याड नदीत सोडण्यात आल्याने मन्याड नदीला आलेल्या पुरामुळे नरसी देगलूर राज्य महामार्गावर असलेल्या टाकळी अटकळी गावात पुराचे पाणी शिरून राज्य महामार्गावरून वाहत असताना दि. 27 सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून हा महामार्ग वाहतुकीसाठी रामतीर्थ पोलिसांनी बंद केले असुन हैदराबाद जाणाऱ्या वाहन चालकाने नरसी, निजामाबाद मार्ग हैदराबाद जावे असे आव्हानही रामतीर्थ पोलिसांनी केले.

जालना जिल्ह्यातील पिकप चालकांने रात्री दोनच्या सुमारास त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यातुन आपले पिकप घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असताना सदरील पिकप वाहून जाऊन एका झाडाला अडकले ही घटना समजताच रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सपोनी विक्रम हराळे यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यासह घटनास्थळी धाव घेऊन येथील स्थानिक नागरिकांच्या मदतीने पुराच्या पाण्यात पिकप मध्ये अडकलेल्या नारायण बारवाल वय वर्ष 42 रा. बदनापूर जिल्हा जालना आणि गोविंद बारवाल वय वर्ष 18 रा. बदनापूर जिल्हा जालना या दोघांना पुराच्या पाण्यातुन बाहेर काढण्यासाठी स्वतःच्या जीवाची परवा न करता रामतीर्थ पोलीस ठाण्याचे पो.हे.का.R.K. काळे, बालाजी मारोती टोकलवाड,भास्कर हणमंत भालेराव यांनी आपली भूमिका निभावले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker