ताज्या बातम्यानांदेडनायगांव

नायगांव येथील चिद्रावारच्या तिन कापड दुकानांवर जीएसटी विभागाची चार दिवस चौकशी

चौकशीचा नेमका उद्देश काय? कारवाई झाली की नाही? प्रसिद्धी माध्यमांमध्ये संभ्रम

सय्यद जाफर

नायगांव :- शहरातील चिद्रावारच्या तिन कापड दुकानांवर जीएसटी विभागाच्या पथकाकडून सलग चार दिवस चौकशी करण्यात आल्याने शहरातील व्यापारी वर्गात तसेच नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुकानांमध्ये चार दिवस नेमकी कोणत्या बाबींची तपासणी केली, या चौकशीत काय आढळून आले आणि त्यानंतर कोणती कारवाई करण्यात आली, याबाबत अधिकृत माहिती समोर न आल्याने प्रसिद्धी माध्यमांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नायगांव शहरातील जुना मोंढा, मुख्य बाजारपेठ मधील व नांदेड -हैद्राबाद राज्यमहामा र्गावरील अशा चिद्रावारच्या तिन कापड दुकानांमध्येजीएसटी विभागाच्या पथकाने सलग चार दिवस विविध कागदपत्रे, व्यवहाराशी संबंधित नोंदी तसेच इतर आर्थिक बाबींची तपासणी केल्याची माहिती आहे. या कालावधीत विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुकानातील व्यवहार आणि उपलब्ध कागदपत्रांची पडताळणी केल्याचे सांगितले जात आहे. 

मात्र, या चौकशीमागील नेमके कारण काय होते, याबाबत विभागाकडून अद्याप स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही.जीएसटी विभागाकडून एखाद्या व्यापारी प्रतिष्ठानाची अनेक दिवस तपासणी केली जाते, तेव्हा त्यामागे करप्रणालीशी संबंधित काही बाबींची पडताळणी, आर्थिक व्यवहारांची तपासणी अथवा नोंदींचे परीक्षण असू शकते. मात्र, चिद्रावारच्या प्रकरणात नेमकी कोणती बाब तपासण्यात आल. हे अधिकृतरीत्या स्पष्ट झालेले नाही.

चार दिवस चाललेल्या चौकशीनंतर संबंधित प्रतिष्ठानावर कोणतीही कारवाई झाली आहे का? नोटीस बजावण्यात आली आहे का? दंड अथवा कराची मागणी करण्यात आली आहे का? की चौकशी केवळ कागदपत्रांच्या पडताळणीपुरती मर्यादित आहे? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत.या संपूर्ण प्रकरणाबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नसल्यामुळे स्थानिक प्रसिद्धी माध्यमांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर जीएसटी विभागाकडून कारवाईचा तपशील किंवा चौकशीचा निष्कर्ष जाहीर होणे अपेक्षित असताना त्याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान, केवळ जीएसटी विभागाने चौकशी केली म्हणून संबंधित व्यापाऱ्यांकडून करचोरी अथवा कोणताही गैरप्रकार झाला आहे, असा निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. चौकशीचा अंतिम निष्कर्ष आणि विभागाची अधिकृत कारवाई समोर आल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होऊ शकते.नायगांव शहरातील तिन मोठ्या कापड दुकानांवर सलग चार दिवस जीएसटी विभागाची चौकशी झाल्याने शहरातील व्यापारी वर्गाचेही या प्रकरणाकडे लक्ष लागले आहे. जीएसटीशी संबंधित नियमांचे पालन, बिलिंग, कर भरणा आणि व्यापारी व्यवहारातील पारदर्शकता या बाबींवर या चौकशीमुळे पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

चार दिवस चौकशी झाली, मात्र कारवाई काय झाली? हा प्रश्न सध्या अनुत्तरित असून, जीएसटी विभागाकडून अधिकृत स्पष्टीकरण मिळाल्यानंतरच या प्रकरणाचे नेमके चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे जीएसटी विभागाच्या पुढील भूमिकेकडे नायगांवकरांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!